शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

लोकप्रतिनिधी निवांत, प्रशासनाचे झोपेचे सोंग; ऑटोचालकांनी खड्ड्यांना वाहिले फुले अन् रांगोळी

By मारोती जुंबडे | Updated: December 29, 2023 16:58 IST

मागील काही दिवसापासून परभणी शहरातून जाणाऱ्या परभणी- वसमत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.

परभणी: सर्वसामान्यांच्या करातून होणाऱ्या विकास कामांच्या दर्जाबाबत परभणीकरांना अद्यापही सजगता आली नसल्याने आजही धूळ आणि खड्ड्यातून नागरिक मार्ग काढत आहेत. शुक्रवारी शहरातील काही ऑटो चालकांनी एकत्र येत रेल्वे स्थानक ते बस स्थानक दरम्यान असलेल्या खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून रांगोळी काढल्या. त्यामुळे हे अनोखे आंदोलन नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला.

मागील काही दिवसापासून परभणी शहरातून जाणाऱ्या परभणी- वसमत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची लांबी- रुंदी एवढी वाढली आहे की, वाहने या खड्ड्यात अडकून पडत आहेत. मात्र याचे कोणतेही सोयर- सुतक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना नसल्याचे दिसून येत आहे. त्याच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना वैद्यकीय प्रतिनिधींनी काही दिवसापुर्वी हार घालून अनोखे आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग येईल आणि हे खड्डे किमान बुजवतील, अशी अपेक्षा परभणीकरांना होती. परंतु गेंड्याची कातडी पांगरलेले प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील काही ऑटो चालकांनी एकत्र येत परभणी- वसमत रस्त्यावरील ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून रांगोळी काढल्या.

या अनोख्या आंदोलनाने परभणीकरांमध्ये चर्चा सुरू होती, परंतु, हे खड्डे बुजवणार कधी? यासाठी पुढाकार घेणार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. दुसरीकडे सरकारच्या विरोधात असणाऱ्यांनी याबाबत आवाज उठवून किमान खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र शहरात असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे विरोधकांचे काम ऑटो चालकांनी केले असेच या आंदोलनावरून दिसून येत आहे.

जनसेवकांनी ओळखावी जबाबदारीजनतेचे सेवक म्हणून ज्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना लोकशाहीने जबाबदारी दिली आहे, त्यातीलही काही मंडळी स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी घबाड मिळविण्याकरीता सातत्याने धडपड करीत आहेत. अशा स्वार्थी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना जनतेने वठणीवर आणले पाहिजे, त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली पाहिजे, शिवाय त्यांचे अस्तित्व हे या जनतेमुळेच आहे, याचीही त्यांना जाण करून दिली पाहिजे, तरच त्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडेल, अन्यथा अजून काही वर्ष परभणी शहरातील नागरिकांना खड्डे आणि धुळीतूनच मार्ग करावे लागणार आहे. तसेच वैद्यकीय प्रतिनिधी, ॲटो चालक यांच्यासह सर्वसामान्यांना आंदोलन करुन आपला राग व्यक्त करावा लागणार आहे. त्यासाठी जनसेवकांनी आपली जबाबदारी ओळखून किमान परभणीकरांच्या मूलभूत सुविधांसाठी तरी झगडावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीauto rickshawऑटो रिक्षा