शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

लोकप्रतिनिधी निवांत, प्रशासनाचे झोपेचे सोंग; ऑटोचालकांनी खड्ड्यांना वाहिले फुले अन् रांगोळी

By मारोती जुंबडे | Updated: December 29, 2023 16:58 IST

मागील काही दिवसापासून परभणी शहरातून जाणाऱ्या परभणी- वसमत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.

परभणी: सर्वसामान्यांच्या करातून होणाऱ्या विकास कामांच्या दर्जाबाबत परभणीकरांना अद्यापही सजगता आली नसल्याने आजही धूळ आणि खड्ड्यातून नागरिक मार्ग काढत आहेत. शुक्रवारी शहरातील काही ऑटो चालकांनी एकत्र येत रेल्वे स्थानक ते बस स्थानक दरम्यान असलेल्या खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून रांगोळी काढल्या. त्यामुळे हे अनोखे आंदोलन नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला.

मागील काही दिवसापासून परभणी शहरातून जाणाऱ्या परभणी- वसमत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची लांबी- रुंदी एवढी वाढली आहे की, वाहने या खड्ड्यात अडकून पडत आहेत. मात्र याचे कोणतेही सोयर- सुतक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना नसल्याचे दिसून येत आहे. त्याच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना वैद्यकीय प्रतिनिधींनी काही दिवसापुर्वी हार घालून अनोखे आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग येईल आणि हे खड्डे किमान बुजवतील, अशी अपेक्षा परभणीकरांना होती. परंतु गेंड्याची कातडी पांगरलेले प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील काही ऑटो चालकांनी एकत्र येत परभणी- वसमत रस्त्यावरील ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून रांगोळी काढल्या.

या अनोख्या आंदोलनाने परभणीकरांमध्ये चर्चा सुरू होती, परंतु, हे खड्डे बुजवणार कधी? यासाठी पुढाकार घेणार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. दुसरीकडे सरकारच्या विरोधात असणाऱ्यांनी याबाबत आवाज उठवून किमान खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र शहरात असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे विरोधकांचे काम ऑटो चालकांनी केले असेच या आंदोलनावरून दिसून येत आहे.

जनसेवकांनी ओळखावी जबाबदारीजनतेचे सेवक म्हणून ज्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना लोकशाहीने जबाबदारी दिली आहे, त्यातीलही काही मंडळी स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी घबाड मिळविण्याकरीता सातत्याने धडपड करीत आहेत. अशा स्वार्थी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना जनतेने वठणीवर आणले पाहिजे, त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली पाहिजे, शिवाय त्यांचे अस्तित्व हे या जनतेमुळेच आहे, याचीही त्यांना जाण करून दिली पाहिजे, तरच त्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडेल, अन्यथा अजून काही वर्ष परभणी शहरातील नागरिकांना खड्डे आणि धुळीतूनच मार्ग करावे लागणार आहे. तसेच वैद्यकीय प्रतिनिधी, ॲटो चालक यांच्यासह सर्वसामान्यांना आंदोलन करुन आपला राग व्यक्त करावा लागणार आहे. त्यासाठी जनसेवकांनी आपली जबाबदारी ओळखून किमान परभणीकरांच्या मूलभूत सुविधांसाठी तरी झगडावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीauto rickshawऑटो रिक्षा