शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लोकप्रतिनिधी निवांत, प्रशासनाचे झोपेचे सोंग; ऑटोचालकांनी खड्ड्यांना वाहिले फुले अन् रांगोळी

By मारोती जुंबडे | Updated: December 29, 2023 16:58 IST

मागील काही दिवसापासून परभणी शहरातून जाणाऱ्या परभणी- वसमत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.

परभणी: सर्वसामान्यांच्या करातून होणाऱ्या विकास कामांच्या दर्जाबाबत परभणीकरांना अद्यापही सजगता आली नसल्याने आजही धूळ आणि खड्ड्यातून नागरिक मार्ग काढत आहेत. शुक्रवारी शहरातील काही ऑटो चालकांनी एकत्र येत रेल्वे स्थानक ते बस स्थानक दरम्यान असलेल्या खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून रांगोळी काढल्या. त्यामुळे हे अनोखे आंदोलन नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला.

मागील काही दिवसापासून परभणी शहरातून जाणाऱ्या परभणी- वसमत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची लांबी- रुंदी एवढी वाढली आहे की, वाहने या खड्ड्यात अडकून पडत आहेत. मात्र याचे कोणतेही सोयर- सुतक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना नसल्याचे दिसून येत आहे. त्याच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना वैद्यकीय प्रतिनिधींनी काही दिवसापुर्वी हार घालून अनोखे आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग येईल आणि हे खड्डे किमान बुजवतील, अशी अपेक्षा परभणीकरांना होती. परंतु गेंड्याची कातडी पांगरलेले प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील काही ऑटो चालकांनी एकत्र येत परभणी- वसमत रस्त्यावरील ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून रांगोळी काढल्या.

या अनोख्या आंदोलनाने परभणीकरांमध्ये चर्चा सुरू होती, परंतु, हे खड्डे बुजवणार कधी? यासाठी पुढाकार घेणार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. दुसरीकडे सरकारच्या विरोधात असणाऱ्यांनी याबाबत आवाज उठवून किमान खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र शहरात असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे विरोधकांचे काम ऑटो चालकांनी केले असेच या आंदोलनावरून दिसून येत आहे.

जनसेवकांनी ओळखावी जबाबदारीजनतेचे सेवक म्हणून ज्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना लोकशाहीने जबाबदारी दिली आहे, त्यातीलही काही मंडळी स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी घबाड मिळविण्याकरीता सातत्याने धडपड करीत आहेत. अशा स्वार्थी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना जनतेने वठणीवर आणले पाहिजे, त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली पाहिजे, शिवाय त्यांचे अस्तित्व हे या जनतेमुळेच आहे, याचीही त्यांना जाण करून दिली पाहिजे, तरच त्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडेल, अन्यथा अजून काही वर्ष परभणी शहरातील नागरिकांना खड्डे आणि धुळीतूनच मार्ग करावे लागणार आहे. तसेच वैद्यकीय प्रतिनिधी, ॲटो चालक यांच्यासह सर्वसामान्यांना आंदोलन करुन आपला राग व्यक्त करावा लागणार आहे. त्यासाठी जनसेवकांनी आपली जबाबदारी ओळखून किमान परभणीकरांच्या मूलभूत सुविधांसाठी तरी झगडावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीauto rickshawऑटो रिक्षा