शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांचे दुर्लक्ष; मुलभूत सुविधाही नाहीत

By admin | Updated: June 17, 2014 00:38 IST

परभणी: मनपा आयुक्त म्हणून अभय महाजन हे रुजू झाल्यानंतर परभणी महानगरपालिकेचा कारभार सुधारेल, असे वाटले होते. परंतु, त्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी-

परभणी: मनपा आयुक्त म्हणून अभय महाजन हे रुजू झाल्यानंतर परभणी महानगरपालिकेचा कारभार सुधारेल, असे वाटले होते. परंतु, त्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिले नसून नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे मनपा गटनेते भगवानराव वाघमारे यांनी केला.या संदर्भातील निवेदन त्यांनी आयुक्तांनाही दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मनपा स्थापन होऊन अडीच वर्षाचा कालावधी संपला. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था व स्वच्छतेसारख्या मुलभूत सुविधाही देण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. या सुविधा देण्यासाठी आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे त्याचा परिणाम अनेक विभागाच्या कामकाजावर होत आहे. जे कर्मचारी आहेत, त्यांच्यावरही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. महत्वाच्या खात्याचा कारभार हा रोजंदारीवरील कर्मचारी बघत असल्याने अनागोंदी आणि गैरव्यवहारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. विद्युत अभियंता नसल्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाली असून १५-१५ दिवस नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. विद्युत खांबावर चढून काम करणारे तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. शहरातील अनेक भागातील गटार तुंबलेले आहेत. कचऱ्याचे ढीग जागोजागी साचले असून शहरातील घंटागाड्या व पाण्याचे टँकर दुरुस्ती व डिझेलच्या अभावामुळे बंद पडत आहेत. दोन वर्षापासून नागरिकांना या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी केली.(जिल्हा प्रतिनिधी)