शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांचे दुर्लक्ष; मुलभूत सुविधाही नाहीत

By admin | Updated: June 17, 2014 00:38 IST

परभणी: मनपा आयुक्त म्हणून अभय महाजन हे रुजू झाल्यानंतर परभणी महानगरपालिकेचा कारभार सुधारेल, असे वाटले होते. परंतु, त्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी-

परभणी: मनपा आयुक्त म्हणून अभय महाजन हे रुजू झाल्यानंतर परभणी महानगरपालिकेचा कारभार सुधारेल, असे वाटले होते. परंतु, त्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिले नसून नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे मनपा गटनेते भगवानराव वाघमारे यांनी केला.या संदर्भातील निवेदन त्यांनी आयुक्तांनाही दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मनपा स्थापन होऊन अडीच वर्षाचा कालावधी संपला. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था व स्वच्छतेसारख्या मुलभूत सुविधाही देण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. या सुविधा देण्यासाठी आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे त्याचा परिणाम अनेक विभागाच्या कामकाजावर होत आहे. जे कर्मचारी आहेत, त्यांच्यावरही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. महत्वाच्या खात्याचा कारभार हा रोजंदारीवरील कर्मचारी बघत असल्याने अनागोंदी आणि गैरव्यवहारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. विद्युत अभियंता नसल्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाली असून १५-१५ दिवस नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. विद्युत खांबावर चढून काम करणारे तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. शहरातील अनेक भागातील गटार तुंबलेले आहेत. कचऱ्याचे ढीग जागोजागी साचले असून शहरातील घंटागाड्या व पाण्याचे टँकर दुरुस्ती व डिझेलच्या अभावामुळे बंद पडत आहेत. दोन वर्षापासून नागरिकांना या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी केली.(जिल्हा प्रतिनिधी)