शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

मनपा आयुक्तांचे दुर्लक्ष; मुलभूत सुविधाही नाहीत

By admin | Updated: June 17, 2014 00:38 IST

परभणी: मनपा आयुक्त म्हणून अभय महाजन हे रुजू झाल्यानंतर परभणी महानगरपालिकेचा कारभार सुधारेल, असे वाटले होते. परंतु, त्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी-

परभणी: मनपा आयुक्त म्हणून अभय महाजन हे रुजू झाल्यानंतर परभणी महानगरपालिकेचा कारभार सुधारेल, असे वाटले होते. परंतु, त्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिले नसून नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे मनपा गटनेते भगवानराव वाघमारे यांनी केला.या संदर्भातील निवेदन त्यांनी आयुक्तांनाही दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मनपा स्थापन होऊन अडीच वर्षाचा कालावधी संपला. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था व स्वच्छतेसारख्या मुलभूत सुविधाही देण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. या सुविधा देण्यासाठी आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे त्याचा परिणाम अनेक विभागाच्या कामकाजावर होत आहे. जे कर्मचारी आहेत, त्यांच्यावरही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. महत्वाच्या खात्याचा कारभार हा रोजंदारीवरील कर्मचारी बघत असल्याने अनागोंदी आणि गैरव्यवहारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. विद्युत अभियंता नसल्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाली असून १५-१५ दिवस नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. विद्युत खांबावर चढून काम करणारे तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. शहरातील अनेक भागातील गटार तुंबलेले आहेत. कचऱ्याचे ढीग जागोजागी साचले असून शहरातील घंटागाड्या व पाण्याचे टँकर दुरुस्ती व डिझेलच्या अभावामुळे बंद पडत आहेत. दोन वर्षापासून नागरिकांना या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी केली.(जिल्हा प्रतिनिधी)