शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू दर अधिक तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, मराठवाड्यातही दररोज शेकडो बाधितांची भर पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये धास्ती निर्माण झाली ...

राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, मराठवाड्यातही दररोज शेकडो बाधितांची भर पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याची स्थिती वाईट असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या २९ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार मराठवाड्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे सर्वात जास्त प्रमाण औरंगाबाद जिल्ह्याचे आहे. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.९२ टक्के असून, सर्वात वाईट कामगिरी परभणी जिल्ह्याची आहे. परभणीचा रिकव्हरी रेट ७६.७९ टक्के आहे. रुग्ण बरे होण्यात विभागात हिंगोली दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.४० टक्के आहे. तसेच नांदेड जिल्ह्याचा ८२.८४ टक्के, जालना ८२.०९ टक्के, उस्मानाबाद ७८.९१ टक्के, बीड ७७.६९ टक्के, तर सातव्या क्रमांकावरील लातूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ७७.२२ टक्के आहे.

एकीकडे रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्याचे प्रमाण कमी असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर मात्र मराठवाड्यात सर्वाधिक आहे. परभणीचा मृत्यूदर २.४६ टक्के आहे. त्यानंतर उस्मानाबाद २.२७, नांदेड २.०८, औरंगाबाद २.०२ टक्के, हिंगोली १.८० टक्के, बीड १.७५ टक्के, लातूर १.७३ टक्के आणि जालना जिल्ह्याचा सर्वात कमी म्हणजे १.६२ टक्के मृत्यू दर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचार पद्धतीमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. औरंगाबादसारख्या मोठ्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असताना हे परभणी जिल्ह्यात का शक्य होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

संपर्कातील व्यक्ती शोधण्यात मागेच

कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम प्रशासनाचे आहे. परंतु यामध्येदेखील परभणी जिल्हा मागेच आहे. जिल्ह्याचे कॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण ५.९० टक्के आहे. त्या तुलनेत जालना जिल्ह्याचे सर्वाधिक म्हणजे १९.१६ टक्के, बीडचे १७.६७ टक्के, हिंगोली १७.१२ टक्के, नांदेड १६.६८ टक्के, औरंगाबाद १२.४९ टक्के, लातूर ११.६७ टक्के, तर उस्मानाबद जिल्ह्याचे प्रमाण ९.१८ टक्के आहे.