शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST

परभणी : दोन दिवसांपासून जिल्ह्यांत संततधार पाऊस होत असून, या पावसाने हाहाकार उडविला आहे. पालम तालुक्यातील बनवस येथील १०० ...

परभणी : दोन दिवसांपासून जिल्ह्यांत संततधार पाऊस होत असून, या पावसाने हाहाकार उडविला आहे. पालम तालुक्यातील बनवस येथील १०० घरात पुराचे पाणी शिरले असून, पालम, गंगाखेड, सेलू, जिंतूर या तालुक्यातील अनेक मार्ग पुलावर पाणी आल्याने बंद पडले आहेत. शेत जमिनीत पाणी साचून पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात या वर्षी दमदार पाऊस होत आहे. दोन दिवसांपासून तर संततधार वृष्टी सुरू असून, प्रकल्प तुडुंब झाल्याने अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे पालम तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.

बनवसमध्ये १०० घरांत शिरले पाणी

पालम : तालुक्यातील बनवस येथे पुराच्या पाण्याने हलकल्लोळ माजविला आहे. पुराचे पाणी गावात शिरले असून, १०० घरे पाण्याखाली आहेत, तसेच या गावाचा संपर्क तुटला आहे. अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, घरासमोरील मोटारसायकल वाहून गेल्या आहेत.

बनवस गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या उसाव्याचे पाणी गावात शिरल्याने, अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली. अनेक कुटुंबांत दुपारपासून चुली पेटल्या नाहीत.

पालम-ताडकळ महामार्ग बंद

पालम : गोदावरी नदीवरील धानोरा काळे येथील पूल पाण्याखाली गेला असून, पालम-पूर्णा या राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

गोदावरी नदीला रात्रीपासून पूर आला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता गोदावरीची पाणी पातळी ३६४.७० मीटर एवढी होती. त्यामुळे धानोरा काळे पुलावरून पाणी वाहत असल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने वाहने अडकली आहेत. पाणी लवकर उतरण्याची शक्यता नसल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुराच्या पाण्यात अडकली बस

पालम : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले. ही घटना गंगाखेड ते पालम रस्त्यावर केरवाडी गावालगत घडली. जेसीबीच्या साहाय्याने बस पाण्याबाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. केरवाडी गावालगत गळाटी नदीच्या पुलावरून पाणी वहात आहे. पालमकडून येणाऱ्या बस चालकाला पाण्याचा अंदाज लागला नाही. त्यामुळे चालकाने बस तिथेच थांबवून प्रवाशांना खाली उतरविण्याचा निर्णय घेतला. बसमध्ये १६ प्रवासी होते.