शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
5
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
6
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
7
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
8
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
9
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
10
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
11
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
12
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
13
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
14
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
15
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
16
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
17
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
18
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
19
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत

मदतीच्या अर्जांचा जिल्हा कचेरीत ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

परभणी : न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात समाजमाध्यमांवरून फिरणाऱ्या पोस्टचा आधार घेत कोरोनामुक्त नागरिकांनी आता झालेला खर्च मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज ...

परभणी : न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात समाजमाध्यमांवरून फिरणाऱ्या पोस्टचा आधार घेत कोरोनामुक्त नागरिकांनी आता झालेला खर्च मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत प्रशासनाकडे असे अडीचशेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र आलेल्या अर्जांच्या अनुषंगाने राज्यस्तरावरून कोणतेही निर्देश नसल्याने या अर्जांवर अद्याप निर्णय झालेला नाही. कोरोनाच्या संसर्गकाळात जिल्ह्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. या काळात अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. अशा रुग्णांना झालेला वैद्यकीय खर्च परत मिळावा, यासाठी न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर अद्याप निर्णय झाला नसला तरी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना त्यांचा वैद्यकीय खर्च शासनाकडून मिळेल, अशा पोस्ट समाजमाध्यमातून व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा खर्च मिळण्याच्या आशेने विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या नागरिकांनी आता जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रशासनाला यासंदर्भाने कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे केवळ अर्ज दाखल करून हे अर्ज पॅरामाऊंट आरोग्य सेवा आणि विमा टीपीए प्रा.लि. या कंपनीच्या जिल्हाप्रमुखांकडे पाठविले जात आहेत. कोरोनाचा वैद्यकीय खर्च मिळावा, यासाठी आतापर्यंत अडीचशेहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे मदतीची आशा लावून असलेल्या अर्जदारांना मदत मिळणार नसेल तर प्रशासनाकडून तसे स्पष्ट करणे गरजेेचे झाले आहे.

योजनेत असेल तरच मिळेल मदत

न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावून हे अर्ज केले जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयात रुग्णाने उपचार घेणे बंधनकारक आहे. परभणी शहरात अशी चार खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयात उपचार घेतानाही जनआरोग्य योजनेच्या मदतीस पात्र असलेल्या घटकांची पूर्तता करणाऱ्या अर्जांचाच विचार केला जाणार आहे. जनआरोग्य योजनेत समाविष्ट होण्यासाठी रुग्णाचे उपचार घेतानाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन ९४ पेक्षा कमी असावे, असा एक नियम आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या या अर्जांची चाळणी करून त्यात योजनेच्या नियमांत बसत असतील त्याच अर्जांचा विचार केला जाणार असल्याचे महात्मा फुले जनआरोग्य योजना विभागातून सांगण्यात आले.

केंद्राच्या सहसचिवांचाही दिला जातो पुरावा

याच अनुषंगाने भारत सरकारचे सहसचिव संजीवकुमार जिंदाल यांच्या १४ मार्च २०२० च्या पत्राचाही संदर्भ काही अर्जदारांनी दिला आहे. त्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून नैसर्गिक आपत्तीने प्रभावित व्यक्तींसाठी १४ व्या वित्त आयोगातून तरतूद करण्याची शिफारस केली आहे. मात्र यासंदर्भातही प्रशासनाला कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे या पत्राचा संदर्भ घेऊन मदत मिळण्याची आशा नाही.

प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची गरज

गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचे अर्ज प्रशासनाकडे येत होते. त्यावर जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून कोविडमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत देण्याबाबत कोणतेही निर्देश शासनातर्फे सध्या प्राप्त नाहीत. समाजमाध्यमांत फिरत असलेला संदेश चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अशा प्रकारचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले तर नागरिकांचा वेळ व खर्च वाचू शकेल.