शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

खिळखिळ्या आरोग्य यंत्रणेला द्यावी लागेल बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख ३६ हजार एवढी आहे. या जनगणनेला आता दहा वर्षांचा कालावधी लोटला असून, ...

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख ३६ हजार एवढी आहे. या जनगणनेला आता दहा वर्षांचा कालावधी लोटला असून, ही लोकसंख्या २१ लाखांच्या पुढे सरकली आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विचार करता जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. शहरी भागात जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागात आतापर्यंत असलेले ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रातून (कोरोना काळात ४ केंद्रांची भर) आरोग्य सेवा पुरविली जाते. आरोग्य केंद्रांमधील मनुष्यबळाची समस्या, उपचारासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामुग्री आणि आरोग्य केंद्रांच्या इमारतीचा प्रश्न कायम चर्चेत असतो. ३० हजार लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्याची लोकसंख्या पाहता हे आरोग्य केंद्र तोकडे पडत आहेत. शिवाय आरोग्य केंद्रांमधून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवाही अतिशय प्राथमिक दर्जाच्या आहेत.

जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयही मनुष्यबळाच्या आजाराने ग्रासलेले आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची जवळपास सर्वच पदे या रुग्णालयात रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी देखील जोखमीच्या रुग्णांवर हमखास उपचार होण्याची हमी अजूनही मिळत नाही. कोरोनाच्या संकटानंतर या समस्या उघड्या पडल्या. प्रशासनाला बाहेरुन तात्पुरत्या स्वरुपात मनुष्यबळ उपलब्ध करावे लागले. गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटीलेटर या सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या. त्या कोरोनाच्या काळात निर्माण करण्यात आल्या. त्यामुळे भविष्यात सरकारी रुग्णालयात जोखमीच्या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्याची हमी रुग्णांना मिळेल, अशी सुविधा उपलब्ध उपलब्ध करण्याचा संकल्प प्रशासनाला नूतन वर्षात करावा लागणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पदच प्रभारी

मनुष्यबळाची सुविधा या विभागाला मागील अनेक वर्षांपासून जाणवत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी हे मुख्य पदच जिल्ह्यात रिक्त आहेत. जि.प.च्या आरोग्य विभागात अधिकाऱ्यांची २२ आणि कर्मचाऱ्यांची २२८ पदे रिक्त आहेत. त्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी अशी पदे रिक्त आहेत. अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त असतील तर आरोग्य सेवा चालवायची कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे.