शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरिजायवर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

पालकमंत्री बदलाच्या पुन्हा हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:30 IST

परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विषयी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी अद्यापही कायम असून, मुंबई येथे यासंदर्भात ...

परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विषयी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी अद्यापही कायम असून, मुंबई येथे यासंदर्भात गुरुवारी बैठक होणार असल्याची चर्चा आहे.

पालकमंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांना वेळ देत नाहीत, त्यांची कामे करीत नाहीत, अशी ओरड गेल्या वर्षभरापासून पक्षाच्या नेतेमंडळींकडून केली जात होती. त्यानंतर पालकमंत्री बदलाची मागणीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे, माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर आदींनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी पालकमंत्री मलिक यांना परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांमधील मतभेद मिटल्याचे वातावरण दिसून येत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास पालकमंत्री परभणीत आले असता, पक्षाच्या वतीने आयोजित अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे अंतर्गत मतभेद मिटले असे वाटत असतानाच पुन्हा पालकमंत्र्यांविषयी पदाधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे समजते. १५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हा नियोजन समिती निधी वितरणाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी पुन्हा अजित पवार यांच्याकडे पालकमंत्र्यांची तक्रार केली असल्याचे समजते. या तक्रारीवरून चर्चेसाठी अजित पवार यांनी आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे व माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांना १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत चर्चेसाठी बोलावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या बैठकीत काय चर्चा होते, पालकमंत्र्यांमध्ये बदल होतो की पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होतेे, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

जयंत पाटील जिल्हा दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेअंतर्गत २३ फेब्रुवारी रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दिवशी दुपारी ३.३० वाजता ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली जाणार असल्याचे समजते.