शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

पालकमंत्री बदलाच्या पुन्हा हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:30 IST

परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विषयी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी अद्यापही कायम असून, मुंबई येथे यासंदर्भात ...

परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विषयी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी अद्यापही कायम असून, मुंबई येथे यासंदर्भात गुरुवारी बैठक होणार असल्याची चर्चा आहे.

पालकमंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांना वेळ देत नाहीत, त्यांची कामे करीत नाहीत, अशी ओरड गेल्या वर्षभरापासून पक्षाच्या नेतेमंडळींकडून केली जात होती. त्यानंतर पालकमंत्री बदलाची मागणीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे, माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर आदींनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी पालकमंत्री मलिक यांना परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांमधील मतभेद मिटल्याचे वातावरण दिसून येत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास पालकमंत्री परभणीत आले असता, पक्षाच्या वतीने आयोजित अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे अंतर्गत मतभेद मिटले असे वाटत असतानाच पुन्हा पालकमंत्र्यांविषयी पदाधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे समजते. १५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हा नियोजन समिती निधी वितरणाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी पुन्हा अजित पवार यांच्याकडे पालकमंत्र्यांची तक्रार केली असल्याचे समजते. या तक्रारीवरून चर्चेसाठी अजित पवार यांनी आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे व माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांना १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत चर्चेसाठी बोलावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या बैठकीत काय चर्चा होते, पालकमंत्र्यांमध्ये बदल होतो की पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होतेे, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

जयंत पाटील जिल्हा दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेअंतर्गत २३ फेब्रुवारी रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दिवशी दुपारी ३.३० वाजता ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली जाणार असल्याचे समजते.