शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री बदलाच्या पुन्हा हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:30 IST

परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विषयी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी अद्यापही कायम असून, मुंबई येथे यासंदर्भात ...

परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विषयी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी अद्यापही कायम असून, मुंबई येथे यासंदर्भात गुरुवारी बैठक होणार असल्याची चर्चा आहे.

पालकमंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांना वेळ देत नाहीत, त्यांची कामे करीत नाहीत, अशी ओरड गेल्या वर्षभरापासून पक्षाच्या नेतेमंडळींकडून केली जात होती. त्यानंतर पालकमंत्री बदलाची मागणीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे, माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर आदींनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी पालकमंत्री मलिक यांना परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांमधील मतभेद मिटल्याचे वातावरण दिसून येत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास पालकमंत्री परभणीत आले असता, पक्षाच्या वतीने आयोजित अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे अंतर्गत मतभेद मिटले असे वाटत असतानाच पुन्हा पालकमंत्र्यांविषयी पदाधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे समजते. १५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हा नियोजन समिती निधी वितरणाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी पुन्हा अजित पवार यांच्याकडे पालकमंत्र्यांची तक्रार केली असल्याचे समजते. या तक्रारीवरून चर्चेसाठी अजित पवार यांनी आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे व माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांना १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत चर्चेसाठी बोलावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या बैठकीत काय चर्चा होते, पालकमंत्र्यांमध्ये बदल होतो की पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होतेे, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

जयंत पाटील जिल्हा दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेअंतर्गत २३ फेब्रुवारी रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दिवशी दुपारी ३.३० वाजता ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली जाणार असल्याचे समजते.