शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

परभणी जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले, पण सर्वत्र स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व 

By राजन मगरुळकर | Updated: December 20, 2022 17:31 IST

स्थानिक नेत्यांनी आपले गड राखले तर काही ठिकाणी नवीन आघाडी तसेच गावातील पॅनल निवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

परभणी :जिल्ह्यातील ११९ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल मंगळवारी दुपारी हाती आले. या निकालांमध्ये बहुतांश गावांमध्ये स्थानिक आघाड्यांचे पॅनल विजयी झाल्याचे दिसून येत आहे. यासह विविध पक्षांनी सुद्धा ग्रामपंचायत निकालामध्ये बाजी मारली आहे. मात्र, सर्वाधिक यश स्थानिक आघाड्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ११९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. ८५ टक्के मतदान ग्रामपंचायतीसाठी झाल्याने निवडणूक निकालाची सुरस निर्माण झाली होती. मंगळवारी सकाळी दहा वाजता सर्वच तालुक्याच्या तहसीलमध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. टेबलनिहाय व फेरीनिहाय हळूहळू निकाल हाती येत होते. त्यानुसार पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. 

स्थानिक नेत्यांनी आपले गड राखले तर काही ठिकाणी नवीन आघाडी तसेच गावातील पॅनल निवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. सर्वच पक्षांकडून तसेच स्थानिक प्रमुख नेत्यांकडून वेगवेगळे दावे-प्रति दावे केले जात असल्याने प्रत्यक्ष कोणत्या पक्षाकडे किती ग्रामपंचायती आल्या, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतparabhaniपरभणी