शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

घंटागाड्यांच्या कामकाजावर जीपीएसची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST

शहरातील कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्या स्वच्छता विभागाने नियोजन केले आहे. वसाहतींची संख्या वाढली तशी शहरातील ...

शहरातील कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्या स्वच्छता विभागाने नियोजन केले आहे. वसाहतींची संख्या वाढली तशी शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनत असल्याने मनपाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. कचरा संकलनासाठी ५५ घंटागाड्या शहरात कार्यरत असून, या सर्व घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. शहरात दररोज प्रभागांमध्ये या घंटा गाड्या फिरत आहेत का? कचऱ्याचे संकलन केले जाते का? यावर स्वच्छता निरीक्षक नियोजन करतात. त्याचप्रमाणे प्रत्येक घंटागाड्यांना बसविलेल्या जीपीएस यंत्रणेच्या साह्याने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नियंत्रण ठेवले जाते. कचरा उचलण्यासाठी मनपाकडे ७० वाहने असून, त्याचे दररोज नियोजन केले जाते. संकलित केलेला कचरा बोरवंड भागातील घरकचरा व्यवस्थापन प्रकल्पात टाकला जातो. या ठिकाणी पीट कंपोस्टिंग, विंड्रो कंपोस्टिंगच्या साह्याने खताची निर्मिती केली जाते. तर बायोगॅस प्रकल्पात दररोज १० टन बायोगॅस तयार केला जात आहे. पीट कंपोस्टिंगसाठी मोठा हौद तयार करण्यात आला असून, त्यापासून खत निर्मिती होत आहे.

मागील सहा महिन्यांपासून शहरातून कचऱ्याचे संकलन वाढविण्यात आले आहे. ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक असा तीव वेगवेगळ्या प्रकारचा कचरा संकलित केला जात असून, त्यातील बहुतांश कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याचे निर्मूलन करण्यात मनपाला बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे.

लवकरच आर.डी.एफ. प्रकल्पाची उभारणी

संकलित झालेल्या कचऱ्यावर मॅकेनिकल प्रोसेसिंग करण्यासाठी आर.डी.एफ. प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव औरंगाबाद येथील जीवन प्राधिकरणाकडे पाठिवला आहे. या प्रकल्पास मंजुरी मिळताच बोरवंड येथे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. रेडी ड्राय फ्यूअल या कचऱ्यापासून तयार केले जाणार आहे.

तन्वीर बेग, अभियंता, मनपा परभणी

विलग करुन कचऱ्यावर प्रक्रिया

शहरात जमा होणाऱ्या सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केले जात आहे. प्लास्टिक, पुठ्ठा, लोखंड अशा कचरा वेगवेगळा केला जात आहे. सध्या मॅन्युअली हे काम केले जात आहे. काही दिवसांमध्ये ॲटोमॅटिक विलगीकरणाची यंत्रणा मनपा उभारणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियान कक्षाच्या वतीने देण्यात आली.