शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

घंटागाड्यांच्या कामकाजावर जीपीएसची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST

शहरातील कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्या स्वच्छता विभागाने नियोजन केले आहे. वसाहतींची संख्या वाढली तशी शहरातील ...

शहरातील कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्या स्वच्छता विभागाने नियोजन केले आहे. वसाहतींची संख्या वाढली तशी शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनत असल्याने मनपाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. कचरा संकलनासाठी ५५ घंटागाड्या शहरात कार्यरत असून, या सर्व घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. शहरात दररोज प्रभागांमध्ये या घंटा गाड्या फिरत आहेत का? कचऱ्याचे संकलन केले जाते का? यावर स्वच्छता निरीक्षक नियोजन करतात. त्याचप्रमाणे प्रत्येक घंटागाड्यांना बसविलेल्या जीपीएस यंत्रणेच्या साह्याने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नियंत्रण ठेवले जाते. कचरा उचलण्यासाठी मनपाकडे ७० वाहने असून, त्याचे दररोज नियोजन केले जाते. संकलित केलेला कचरा बोरवंड भागातील घरकचरा व्यवस्थापन प्रकल्पात टाकला जातो. या ठिकाणी पीट कंपोस्टिंग, विंड्रो कंपोस्टिंगच्या साह्याने खताची निर्मिती केली जाते. तर बायोगॅस प्रकल्पात दररोज १० टन बायोगॅस तयार केला जात आहे. पीट कंपोस्टिंगसाठी मोठा हौद तयार करण्यात आला असून, त्यापासून खत निर्मिती होत आहे.

मागील सहा महिन्यांपासून शहरातून कचऱ्याचे संकलन वाढविण्यात आले आहे. ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक असा तीव वेगवेगळ्या प्रकारचा कचरा संकलित केला जात असून, त्यातील बहुतांश कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याचे निर्मूलन करण्यात मनपाला बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे.

लवकरच आर.डी.एफ. प्रकल्पाची उभारणी

संकलित झालेल्या कचऱ्यावर मॅकेनिकल प्रोसेसिंग करण्यासाठी आर.डी.एफ. प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव औरंगाबाद येथील जीवन प्राधिकरणाकडे पाठिवला आहे. या प्रकल्पास मंजुरी मिळताच बोरवंड येथे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. रेडी ड्राय फ्यूअल या कचऱ्यापासून तयार केले जाणार आहे.

तन्वीर बेग, अभियंता, मनपा परभणी

विलग करुन कचऱ्यावर प्रक्रिया

शहरात जमा होणाऱ्या सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केले जात आहे. प्लास्टिक, पुठ्ठा, लोखंड अशा कचरा वेगवेगळा केला जात आहे. सध्या मॅन्युअली हे काम केले जात आहे. काही दिवसांमध्ये ॲटोमॅटिक विलगीकरणाची यंत्रणा मनपा उभारणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियान कक्षाच्या वतीने देण्यात आली.