शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

परभणी जिल्ह्यातील १४ शाळा शासनाने केल्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:34 IST

राज्य शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १२ प्राथमिक व २ खासगी माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होण्याची शक्यता आहे.

परभणी जिल्ह्यातील १४ शाळाशासनाने केल्या बंदलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १२ प्राथमिक व २ खासगी माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होण्याची शक्यता आहे.राज्यात इंग्रजी शाळांची संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत चालले आहे. विशेषत: ग्रामीण भागात वाड्या-तांड्यावर याचा अधिक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या दृष्टीकोनातून सर्व शाळांचे शिक्षण विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील विलासनगर जि.प. शाळा (विद्यार्थी ८, कार्यरत शिक्षक २), चिलगरवाडी पाटी (विद्यार्थी ८, शिक्षक २), पांढरमाती तांडा (विद्यार्थी ८, शिक्षक २), झोला फाटा (विद्यार्थी २, शिक्षक २), महादेववाडी (विद्यार्थी १०, शिक्षक २), कांगणेवाडी (विद्यार्थी ५, शिक्षक२), जिंतूर तालुक्यातील वस्सा (विद्यार्थी ७, शिक्षक २), शहापूर वाडी (विद्यार्थी ७, शिक्षक २), पाथरी तालुक्यातील वसंतनगर तांडा, रेणापूर (विद्यार्थी १०, शिक्षक २), गणेशवस्ती बाणेगाव (विद्यार्थी ८, शिक्षक २), लक्ष्मीनगर लिंबा (विद्यार्थी ९, शिक्षक १), सोनपेठ तालुक्यातील शेळगाव तांडा (विद्यार्थी ६, कार्यरत शिक्षक २) या जि.प.च्या शाळांचा समावेश आहे. या शिवाय परभणी व गंगाखेड येथील प्रत्येकी १ खाजगी माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाकडून माहिती पाठविण्यात आली असून या शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतरत्र समायोजन केले जाणार आहे. समायोजनाची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने व सद्यस्थितीत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रियाही स्थगित असल्याने पुढील वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

परभणीजिल्ह्यातील १४ शाळाशासनाने केल्या बंदलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १२ प्राथमिक व २ खासगी माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होण्याची शक्यता आहे.राज्यात इंग्रजी शाळांची संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत चालले आहे. विशेषत: ग्रामीण भागात वाड्या-तांड्यावर याचा अधिक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या दृष्टीकोनातून सर्व शाळांचे शिक्षण विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील विलासनगर जि.प. शाळा (विद्यार्थी ८, कार्यरत शिक्षक २), चिलगरवाडी पाटी (विद्यार्थी ८, शिक्षक २), पांढरमाती तांडा (विद्यार्थी ८, शिक्षक २), झोला फाटा (विद्यार्थी २, शिक्षक २), महादेववाडी (विद्यार्थी १०, शिक्षक २), कांगणेवाडी (विद्यार्थी ५, शिक्षक२), जिंतूर तालुक्यातील वस्सा (विद्यार्थी ७, शिक्षक २), शहापूर वाडी (विद्यार्थी ७, शिक्षक २), पाथरी तालुक्यातील वसंतनगर तांडा, रेणापूर (विद्यार्थी १०, शिक्षक २), गणेशवस्ती बाणेगाव (विद्यार्थी ८, शिक्षक २), लक्ष्मीनगर लिंबा (विद्यार्थी ९, शिक्षक १), सोनपेठ तालुक्यातील शेळगाव तांडा (विद्यार्थी ६, कार्यरत शिक्षक २) या जि.प.च्या शाळांचा समावेश आहे. या शिवाय परभणी व गंगाखेड येथील प्रत्येकी १ खाजगी माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाकडून माहिती पाठविण्यात आली असून या शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतरत्र समायोजन केले जाणार आहे. समायोजनाची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने व सद्यस्थितीत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रियाही स्थगित असल्याने पुढील वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.