शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

१३३ कोटींचा निधी सापडला आचारसंहितेच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

परभणी : जिल्हा नियोजन समितीला ८ डिसेंबर रोजी तब्बल १३३ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून यातील बहुतांश निधी हा ...

परभणी : जिल्हा नियोजन समितीला ८ डिसेंबर रोजी तब्बल १३३ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून यातील बहुतांश निधी हा जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी देण्यात येणार आहे. ११ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने हा निधी आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याचा २०० कोटी रुपयांंचा आराखडा सादर केला होता. त्यानुसार राज्य शासनाने नियोजन समितीला एप्रिल महिन्यात जिल्ह्याला ६५ कोटी ९१ लाख ९९ हजार रुपयांचा निधी दिला होता. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी यातील ३२ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपये वापरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून बहुतांश निधी जिल्हा परिषदेच्या विकास योजनांसाठी देण्यात येत असला तरी कोरोनामुळे तो उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी, जूनपासून डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेतील नवीन विकासकामे जवळपास ठप्प झाली होती. त्यामुळे राज्य शासन जिल्हा नियोजन समितीला कधी निधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर ८ डिसेंबर रोजी राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीला १३३ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी दिला. तसे आदेशही काढण्यात आले. त्यामुळे विकासकामांचा मार्ग मोकळा झाला, असे वाटत असतानाच ११ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे पुन्हा एकदा निधी खर्चास ब्रेक लागला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेची १५ डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती; परंतु ग्राम‌पंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. आता ग्रा.पं. आचारसंहिता २१ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर कुठे या निधीच्या खर्चाचे नियोजन जिल्हा परिषदेला करायचे आहे.

ध्वजारोहणास पालकमंत्री आल्यानंतरच निर्णय

विशेष म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतरच पालकमंत्री नवाब मलिक हे २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणासाठी परभणीला येतील. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आराखड्यांना मंजुरी मिळेल. त्यांतर फेब्रुवारी महिन्यात निधी खर्चाची प्रक्रिया सुरू होईल. विविध विकास कामांच्या निविदांच्या प्रक्रियेस १ महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे विकासकामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास मार्च उजाडेल. विशेष म्हणजे ३१ मार्चच्या आत चालू आर्थिक वर्षाचा निधी खर्च करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची यासाठी मोठी कसरत होणार आहे.