शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुके कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे एका रुग्णांमुळेही तालुक्याच्या कोरोनामुक्तीत अडथळा निर्माण ...

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे एका रुग्णांमुळेही तालुक्याच्या कोरोनामुक्तीत अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. संपूर्ण जिल्हा अद्यापही कोरोनामुक्त झाला नाही. चार तालुक्यांच्या ग्रामीण भागात सद्य:स्थितीला एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे सेलू, मानवत, पूर्णा आणि गंगाखेड हे चारही तालुके सद्य:स्थितीला कोरोनामुक्त तालुके म्हणून जाहीर झाले आहेत.

मात्र, दुसरीकडे इतर पाच तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या अजूनही कायम आहे. त्यात परभणी एक, जिंतूर तालुक्यात दोन, सोनपेठ दोन, पालम तालुक्यात एक आणि पाथरी तालुक्याच्या ग्रामीण भागात सहा रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे या तालुक्यांना कोरोनामुक्त होण्यासाठी बाराही रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच नवीन रुग्ण नोंद होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

नियमित मास्कचा वापर, आरटीपीसीआर तपासण्या केल्यास उर्वरित पाच तालुकेदेखील कोरोनामुक्त करणे शक्य होणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातून आरोग्य विभागाने अधिकची प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या गावांमध्ये सक्रिय रुग्ण

सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ सक्रिय रुग्ण नोंद झाले आहेत. त्यात पाथरी तालुक्यातील मंजरथ, बाभूळगाव, डाकूपिंपरी, उमरा येथे प्रत्येकी एक आणि देवनांद्रा येथे दोन सक्रिय रुग्ण आहेत. जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी व भोगाव, परभणी तालुक्यांतील पिंगळी, सोनपेठ तालुक्यातील तुळशीराम तांडा व कोरटेक आणि पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे.

दहा दिवसांत नोंद झालेले रुग्ण

१ ते १० सप्टेंबर या कालावधीत ग्रामीण भागांमधून बारा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. १ सप्टेंबर रोजी ३, २ सप्टेंबर रोजी ४, ३ सप्टेंबर रोजी २, ४ सप्टेंबर रोजी १ आणि ५ सप्टेंबर रोजी २ रुग्णांची नोंद झाली. ६ सप्टेंबरपासून मात्र अद्यापपर्यंत एकही रुग्ण नोंद झाला नाही.

नियम पाळण्याचे आवाहन

जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरी, भागात तसेच तालुक्याच्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीच्या ठिकाणी जात असताना नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सचे पालन केल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनीच पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक झाले आहे.