शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

चार तालुके कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे एका रुग्णांमुळेही तालुक्याच्या कोरोनामुक्तीत अडथळा निर्माण ...

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे एका रुग्णांमुळेही तालुक्याच्या कोरोनामुक्तीत अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. संपूर्ण जिल्हा अद्यापही कोरोनामुक्त झाला नाही. चार तालुक्यांच्या ग्रामीण भागात सद्य:स्थितीला एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे सेलू, मानवत, पूर्णा आणि गंगाखेड हे चारही तालुके सद्य:स्थितीला कोरोनामुक्त तालुके म्हणून जाहीर झाले आहेत.

मात्र, दुसरीकडे इतर पाच तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या अजूनही कायम आहे. त्यात परभणी एक, जिंतूर तालुक्यात दोन, सोनपेठ दोन, पालम तालुक्यात एक आणि पाथरी तालुक्याच्या ग्रामीण भागात सहा रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे या तालुक्यांना कोरोनामुक्त होण्यासाठी बाराही रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच नवीन रुग्ण नोंद होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

नियमित मास्कचा वापर, आरटीपीसीआर तपासण्या केल्यास उर्वरित पाच तालुकेदेखील कोरोनामुक्त करणे शक्य होणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातून आरोग्य विभागाने अधिकची प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या गावांमध्ये सक्रिय रुग्ण

सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ सक्रिय रुग्ण नोंद झाले आहेत. त्यात पाथरी तालुक्यातील मंजरथ, बाभूळगाव, डाकूपिंपरी, उमरा येथे प्रत्येकी एक आणि देवनांद्रा येथे दोन सक्रिय रुग्ण आहेत. जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी व भोगाव, परभणी तालुक्यांतील पिंगळी, सोनपेठ तालुक्यातील तुळशीराम तांडा व कोरटेक आणि पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे.

दहा दिवसांत नोंद झालेले रुग्ण

१ ते १० सप्टेंबर या कालावधीत ग्रामीण भागांमधून बारा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. १ सप्टेंबर रोजी ३, २ सप्टेंबर रोजी ४, ३ सप्टेंबर रोजी २, ४ सप्टेंबर रोजी १ आणि ५ सप्टेंबर रोजी २ रुग्णांची नोंद झाली. ६ सप्टेंबरपासून मात्र अद्यापपर्यंत एकही रुग्ण नोंद झाला नाही.

नियम पाळण्याचे आवाहन

जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरी, भागात तसेच तालुक्याच्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीच्या ठिकाणी जात असताना नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सचे पालन केल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनीच पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक झाले आहे.