शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

चार तालुके कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे एका रुग्णांमुळेही तालुक्याच्या कोरोनामुक्तीत अडथळा निर्माण ...

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे एका रुग्णांमुळेही तालुक्याच्या कोरोनामुक्तीत अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. संपूर्ण जिल्हा अद्यापही कोरोनामुक्त झाला नाही. चार तालुक्यांच्या ग्रामीण भागात सद्य:स्थितीला एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे सेलू, मानवत, पूर्णा आणि गंगाखेड हे चारही तालुके सद्य:स्थितीला कोरोनामुक्त तालुके म्हणून जाहीर झाले आहेत.

मात्र, दुसरीकडे इतर पाच तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या अजूनही कायम आहे. त्यात परभणी एक, जिंतूर तालुक्यात दोन, सोनपेठ दोन, पालम तालुक्यात एक आणि पाथरी तालुक्याच्या ग्रामीण भागात सहा रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे या तालुक्यांना कोरोनामुक्त होण्यासाठी बाराही रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच नवीन रुग्ण नोंद होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

नियमित मास्कचा वापर, आरटीपीसीआर तपासण्या केल्यास उर्वरित पाच तालुकेदेखील कोरोनामुक्त करणे शक्य होणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातून आरोग्य विभागाने अधिकची प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या गावांमध्ये सक्रिय रुग्ण

सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ सक्रिय रुग्ण नोंद झाले आहेत. त्यात पाथरी तालुक्यातील मंजरथ, बाभूळगाव, डाकूपिंपरी, उमरा येथे प्रत्येकी एक आणि देवनांद्रा येथे दोन सक्रिय रुग्ण आहेत. जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी व भोगाव, परभणी तालुक्यांतील पिंगळी, सोनपेठ तालुक्यातील तुळशीराम तांडा व कोरटेक आणि पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे.

दहा दिवसांत नोंद झालेले रुग्ण

१ ते १० सप्टेंबर या कालावधीत ग्रामीण भागांमधून बारा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. १ सप्टेंबर रोजी ३, २ सप्टेंबर रोजी ४, ३ सप्टेंबर रोजी २, ४ सप्टेंबर रोजी १ आणि ५ सप्टेंबर रोजी २ रुग्णांची नोंद झाली. ६ सप्टेंबरपासून मात्र अद्यापपर्यंत एकही रुग्ण नोंद झाला नाही.

नियम पाळण्याचे आवाहन

जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरी, भागात तसेच तालुक्याच्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीच्या ठिकाणी जात असताना नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सचे पालन केल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनीच पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक झाले आहे.