शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुक्तिसंग्रामातील योद्ध्याच्या वारस्याचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले ॲड. गोविंदराव नानल हे परभणीतील जुन्या मेहबूब बाग (आताचे नानलपेठ) येथे वास्तव्याला होते. त्यावेळी ...

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले ॲड. गोविंदराव नानल हे परभणीतील जुन्या मेहबूब बाग (आताचे नानलपेठ) येथे वास्तव्याला होते. त्यावेळी ॲड. नानल यांना सामाजिक प्रतिष्ठा होती. सर्व धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन धन एकत्रित करून स्वातंत्र्यासाठी लढा उभारण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच परभणी शहरातील नागरिकांना एकत्रित करून त्यांनी सर्व प्रथम नानलपेठमध्ये १९३२ मध्ये पहिली बैठक घेतली. या बैठकीकडे निजाम सरकारने फारसे महत्त्व दिले नाही. मात्र त्यानंतर १९३२ मध्ये नानलपेठ येथेच पार पडलेल्या बैठकीत सशस्त्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सेलूत पार पडलेल्या बैठकीस त्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले. पुढे परतूर येथे पार पडलेल्या शिबिरात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बंड करून खऱ्या अर्थाने या सशस्त्र लढ्याला प्रारंभ केला.

ॲड. गोविंदराव नानल यांनी सशस्त्र लढा उभारण्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. येथूनच पुढे हा लढा पेटला आणि निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला.

दरवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जातो. मात्र ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हा लढा उभारण्यासाठी प्राणपणाला लावले. अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या वास्तू जतन करण्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ज्या ठिकाणी सशस्त्र लढ्याची पहिली ठिणगी पडली अशी नानलपेठ भागातील वास्तू समस्त परभणीकरांसाठी प्रेरणा देणारी आहे, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या वास्तूची दुरवस्था झाली आहे.

विद्युत रोहित्राआड नामफलक

स्वातंत्र्य सैनिक ॲड. गोविंदराव नानल यांच्या कार्याची दखल घेऊन शहरातील नानलपेठ भागातील मार्गाला स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव नानल मार्ग असे नामकरण करण्यात आले. मात्र हा नामफलक विद्युत रोहित्राच्या आड गेला असून, अनेक छोट्या झाडींनी वेढला आहे. त्यामुळे नामफलक दर्शनी भागात लावण्याचे औचित्यही कोणी पार पडले नाही, असेच म्हणावे लागेल.