शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मुक्तिसंग्रामातील योद्ध्याच्या वारस्याचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले ॲड. गोविंदराव नानल हे परभणीतील जुन्या मेहबूब बाग (आताचे नानलपेठ) येथे वास्तव्याला होते. त्यावेळी ...

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले ॲड. गोविंदराव नानल हे परभणीतील जुन्या मेहबूब बाग (आताचे नानलपेठ) येथे वास्तव्याला होते. त्यावेळी ॲड. नानल यांना सामाजिक प्रतिष्ठा होती. सर्व धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन धन एकत्रित करून स्वातंत्र्यासाठी लढा उभारण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच परभणी शहरातील नागरिकांना एकत्रित करून त्यांनी सर्व प्रथम नानलपेठमध्ये १९३२ मध्ये पहिली बैठक घेतली. या बैठकीकडे निजाम सरकारने फारसे महत्त्व दिले नाही. मात्र त्यानंतर १९३२ मध्ये नानलपेठ येथेच पार पडलेल्या बैठकीत सशस्त्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सेलूत पार पडलेल्या बैठकीस त्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले. पुढे परतूर येथे पार पडलेल्या शिबिरात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बंड करून खऱ्या अर्थाने या सशस्त्र लढ्याला प्रारंभ केला.

ॲड. गोविंदराव नानल यांनी सशस्त्र लढा उभारण्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. येथूनच पुढे हा लढा पेटला आणि निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला.

दरवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जातो. मात्र ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हा लढा उभारण्यासाठी प्राणपणाला लावले. अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या वास्तू जतन करण्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ज्या ठिकाणी सशस्त्र लढ्याची पहिली ठिणगी पडली अशी नानलपेठ भागातील वास्तू समस्त परभणीकरांसाठी प्रेरणा देणारी आहे, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या वास्तूची दुरवस्था झाली आहे.

विद्युत रोहित्राआड नामफलक

स्वातंत्र्य सैनिक ॲड. गोविंदराव नानल यांच्या कार्याची दखल घेऊन शहरातील नानलपेठ भागातील मार्गाला स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव नानल मार्ग असे नामकरण करण्यात आले. मात्र हा नामफलक विद्युत रोहित्राच्या आड गेला असून, अनेक छोट्या झाडींनी वेढला आहे. त्यामुळे नामफलक दर्शनी भागात लावण्याचे औचित्यही कोणी पार पडले नाही, असेच म्हणावे लागेल.