शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

२३ पाणवठ्यावरून वनविभागाने टिपले ५४२ वन्यप्राणी

By मारोती जुंबडे | Updated: May 25, 2024 16:59 IST

परभणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनसंपदेच्या संवर्धना बरोबरच रक्षणाचे काम केले जाते. पशुगणना ही या कार्यालयाच्या कामकाजाचा एक भाग आहे.

परभणी: येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशूगणनेत २३ पानवठ्यावरून ५४२ वन्यप्राणी टिपल्याची नोंद वन विभागाकडे करण्यात आली आहे. या अहवालात सर्वाधिक हरीण आढळले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

परभणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनसंपदेच्या संवर्धना बरोबरच रक्षणाचे काम केले जाते. पशुगणना ही या कार्यालयाच्या कामकाजाचा एक भाग आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पशु गणना होते. या गणनेत पशुंच्या संख्येनुसार संवर्धनासाठी करावयाच्या उपायोजनांचे नियोजन करणे शक्य होते. त्यामुळे दरवर्षी वन विभागाकडून पशु गणना केली जाते. यंदा २२ ते २४ मे दरम्यान बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाणस्थळावरील वन्यप्राणी प्रगणना करून वन विभागाला अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये जिंतूर व परभणी तालुक्यातील २३ पानवठ्यावर ५४२ वन्यप्राणी पशु गणनेत टिपल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक मोर, ससा, हरिण, नीलगाय, रानडुक्कर आदींचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

इटोली, जिंतूर बिटात सर्वाधिक पशू

वन विभागाने केलेल्या गणनेमध्ये जिंतूर आणि ईटोली या बीटामध्ये पशूंची संख्या अधिक असल्याची नोंद घेण्यात आली. यामध्ये जिंतूर येथील बिटात कृत्रिम पाणवठ्यावर वानर, नीलगाय, मोर असे एकूण १३६ वन्यप्राणी आढळले. तर केहाळ येथील एका पाणवठ्यावर मोर, ससा असे एकूण १२ प्राणी आढळले. त्याचबरोबर भोगाव येथे मोर, वानर, ससा, रानडुक्कर असे एकूण ४४ प्राणी दिसून आले. त्याचबरोबर ईटोली येथील पाच कृत्रिम पाणवठ्यावर वानर, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, ससा, मोर असे एकूण ८६ पशु वनविभागाच्या गणनेत दिसून आले. त्याचबरोबर दाभा येथील दोन कृत्रिम पाणवठ्यावर एकूण ३३ वानर, नीलगाय, डुक्कर, कोल्हा, हरिण पशुपक्षी आढळल्याची नोंद करण्यात आली आहे.

आठ तालुक्यात वन्यप्राणी नाहीत का?

परभणी येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशुगणनेत जिंतूर तालुक्यातील केहाळ, जिंतूर, भोगाव, इटोली, दाभा, गारखेडा, सावरगाव, चौधरणी, वडाळी, आडगाव, मोहखेड येथील पाणवाठ्यावरच पशूंची गणना करण्यात आली. यामध्ये ४९७ पशुपक्षी आढळून आले. त्यामुळे वनविभागाने केवळ एकाच तालुक्यात पशूंची गणना केली आहे का? नसेल तर परभणीसह इतर आठ तालुक्यांमध्ये एकही कोल्हा, काळवीट, ससा, मोर, वानर वास्तव्यास नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.