शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

२३ पाणवठ्यावरून वनविभागाने टिपले ५४२ वन्यप्राणी

By मारोती जुंबडे | Updated: May 25, 2024 16:59 IST

परभणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनसंपदेच्या संवर्धना बरोबरच रक्षणाचे काम केले जाते. पशुगणना ही या कार्यालयाच्या कामकाजाचा एक भाग आहे.

परभणी: येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशूगणनेत २३ पानवठ्यावरून ५४२ वन्यप्राणी टिपल्याची नोंद वन विभागाकडे करण्यात आली आहे. या अहवालात सर्वाधिक हरीण आढळले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

परभणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनसंपदेच्या संवर्धना बरोबरच रक्षणाचे काम केले जाते. पशुगणना ही या कार्यालयाच्या कामकाजाचा एक भाग आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पशु गणना होते. या गणनेत पशुंच्या संख्येनुसार संवर्धनासाठी करावयाच्या उपायोजनांचे नियोजन करणे शक्य होते. त्यामुळे दरवर्षी वन विभागाकडून पशु गणना केली जाते. यंदा २२ ते २४ मे दरम्यान बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाणस्थळावरील वन्यप्राणी प्रगणना करून वन विभागाला अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये जिंतूर व परभणी तालुक्यातील २३ पानवठ्यावर ५४२ वन्यप्राणी पशु गणनेत टिपल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक मोर, ससा, हरिण, नीलगाय, रानडुक्कर आदींचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

इटोली, जिंतूर बिटात सर्वाधिक पशू

वन विभागाने केलेल्या गणनेमध्ये जिंतूर आणि ईटोली या बीटामध्ये पशूंची संख्या अधिक असल्याची नोंद घेण्यात आली. यामध्ये जिंतूर येथील बिटात कृत्रिम पाणवठ्यावर वानर, नीलगाय, मोर असे एकूण १३६ वन्यप्राणी आढळले. तर केहाळ येथील एका पाणवठ्यावर मोर, ससा असे एकूण १२ प्राणी आढळले. त्याचबरोबर भोगाव येथे मोर, वानर, ससा, रानडुक्कर असे एकूण ४४ प्राणी दिसून आले. त्याचबरोबर ईटोली येथील पाच कृत्रिम पाणवठ्यावर वानर, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, ससा, मोर असे एकूण ८६ पशु वनविभागाच्या गणनेत दिसून आले. त्याचबरोबर दाभा येथील दोन कृत्रिम पाणवठ्यावर एकूण ३३ वानर, नीलगाय, डुक्कर, कोल्हा, हरिण पशुपक्षी आढळल्याची नोंद करण्यात आली आहे.

आठ तालुक्यात वन्यप्राणी नाहीत का?

परभणी येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशुगणनेत जिंतूर तालुक्यातील केहाळ, जिंतूर, भोगाव, इटोली, दाभा, गारखेडा, सावरगाव, चौधरणी, वडाळी, आडगाव, मोहखेड येथील पाणवाठ्यावरच पशूंची गणना करण्यात आली. यामध्ये ४९७ पशुपक्षी आढळून आले. त्यामुळे वनविभागाने केवळ एकाच तालुक्यात पशूंची गणना केली आहे का? नसेल तर परभणीसह इतर आठ तालुक्यांमध्ये एकही कोल्हा, काळवीट, ससा, मोर, वानर वास्तव्यास नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.