शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST

परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण व नातेवाईक उपचारासाठी येतात. मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला ...

परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण व नातेवाईक उपचारासाठी येतात. मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. डेंगू, मलेरिया यासारख्या आजाराचे रुग्ण हजारोच्या संख्येने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे बुधवारी दिसून आले. विशेष म्हणजे या रुग्ण व नातेवाईकांकडून सोशल डिस्टन्स, मास्क वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे असतानाही रुग्णालय प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे एकीकडे तिसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात असताना दुसरीकडे मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखणार कसे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ओपीडी हाऊसफुल

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे सर्दी, ताप, डोके, हात पाय दुखणे, अशक्तपणा येणे यासह आदी आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालया बरोबरच शासकीय रुग्णालयात मोठ्याप्रमाणात उपचारासाठी रुग्ण येत आहेत. बुधवारी केलेल्या पाहणीत जिल्हा सामान्य रुग्णालयाची ओपीडी हाऊस फुल असल्याचे दिसून आले.

डेंगू, मलेरियाचे रुग्ण वाढले

परभणी शहरासह जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून डेंगू, मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बुधवारी केलेल्या पाहणीत खाजगी रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वाधिक डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण उपचार घेताना दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

रुग्णालयात सुपर स्पेडर ठरू नये....

वातावरणात झालेल्या बदलामुळे मागील काही दिवसापासून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येताना मास्क, सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायझर चा कोणताही वापर न करता सरळ उपचार घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात होणारी गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी मधून व्यक्त केली जात आहे.