शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच मोठ्या पावसाचे परभणी जिल्ह्यात तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 15:16 IST

या पावसाळ्यात जिल्ह्यात प्रथमच मोठा पाऊस झाला असून, त्यात दोन विद्यार्थिनी वाहून गेल्याची तर एका महिलेच्या अंगावर भिंत कोसळून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ त्यामुळे या पावसाने तीन बळी जिल्ह्यात घेतले आहेत़ 

ऑनलाईन लोकमत, 

परभणी, दि. २० : या पावसाळ्यात जिल्ह्यात प्रथमच मोठा पाऊस झाला असून, त्यात दोन विद्यार्थिनी वाहून गेल्याची तर एका महिलेच्या अंगावर भिंत कोसळून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ त्यामुळे या पावसाने तीन बळी जिल्ह्यात घेतले आहेत़. 

दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शनिवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला़ शनिवारी मध्यरात्रीनंतर मोठा पाऊस झाला़ प्रशासनाच्या माहितीनुसार सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाभरात ४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ पूर्णा तालुक्यातील पूर्णा (७८), ताडकळस (७३), चुडावा (७७) आणि लिमला (८० मिमी) या चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे़ या पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाले, प्रथमच ओसंडून वाहू लागले़ परभणी तालुक्यातील इंद्रायणी नदीला पूर आला आहे़ तसेच परभणी शहराजवळून वाहणाºया पिंगळगड नाल्याला पूर आला़ विद्यापीठातून बलस्याकडे जाणा-या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला़ 

पालम तालुक्यातील पारवा येथील नाल्यावरील पूल ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चुलत बहिणी वाहून गेल्याची घटना रविवारी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास घडली़ आम्रपाली भगवान येवले (१२) आणि किर्ती सोपान येवले (१९) या दोघी पाण्यात वाहून गेल्या़ काही वेळातच त्यांचे मृतदेह सापडले असून, पालम ग्रामीण रुग्णालयात शवविच्छदन करण्यात आले़ 

पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे भिंत अंगावर पडून प्रभावती चंद्रकांत गायकवाड या ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे़ एकावर एक विटा रचून तयार केलेली ही भिंत रात्री १२ च्या सुमारास पावसामुळे कोसळली आणि त्यात प्रभावती गायकवाड यांचा मृत्यू झाला़ 

जिल्हाभरात दमदार पाऊस झाला असून, पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने सकाळी १० वाजेपर्यंत फळा, सोमेश्वर घोडा, आरखेड आणि उमरथडी या पाच गावांचा संपर्क तुटला होता़ परभणी तालुक्यातील धामोडी नदीला पूर आल्याने आठ गावांचा संपर्क तुटला होता़ दुपारपर्यंत पाणी ओसरले नसल्याने ही गावे संपर्काबाहेर होती़