शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST

अग्निशमन विभाग कार्यालय : पहाटे ४ वाजता परभणी : २४ तास अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाच्या कार्यालयास पहाटे ...

अग्निशमन विभाग कार्यालय : पहाटे ४ वाजता

परभणी : २४ तास अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाच्या कार्यालयास पहाटे ४ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता येथील सर्व यंत्रणा सुस्थितीत व सज्ज असल्याचे दिसून आले. कोणत्याही क्षणी घटना घडल्याचा कॉल येताच सर्व कर्मचारी त्यांच्या गणवेश व तयार बंबासह सज्ज असल्याचे आढळून आले.

परभणी शहराचा विस्तार वाढला आहे. यातच स्पार्किंग तसेच किरकोळ आगीच्या घटना व मोठ्या आगीच्या घटना अधूनमधून घडत असतात. यातच एखादी आगीची घटना घडल्यास अग्निशमन विभाग २४ तास सज्ज आहे की नाही याची पाहणी रविवारी पहाटे ४ वाजता फोन लावून केली असता यंत्रणा सज्ज असल्याचे आढळून आले.

तयार स्थितीत दोन बंब

परभणी शहरातील मोंढा परिसरात सेंट्रल नाक्याच्या बाजूला अग्निशमन विभागाचे फायर स्टेशन आहे. या ठिकाणी दोन बंब मोठ्या वाहनांचे तर एक छोटे वाहन उपलब्ध आहे. यातील दोन्ही मोठे बंब अत्यावश्यक कॉल आल्यास कायमस्वरूपी तयार ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनामध्ये ५ ते ६ हजार लिटर पाण्याचा साठा केलेला आहे.

रात्रीच्या वेळी ५ कर्मचारी कार्यरत

अग्निशमन विभागातील फायर स्टेशन येथे आलेला आपत्कालीन कॉल उचलण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त असतो. यासह रात्रीच्या वेळी दोन्ही वाहनावरील चालक, २ फायरमन व १ मदतनीस अशा पाच जणांची टीम तयार असल्याचे दिसून आले. यासह अग्निशमन अधिकारीसुध्दा नेहमीच अलर्ट असतात. याशिवाय दिवसभरात ५ कर्मचारी कार्यरत असतात.

नियम काय सांगतो ?

शहरात एखादी आगीची घटना घडल्यास संबंधित ठिकाणावरून आलेला फोन घेतल्यानंतर यंत्रणा अवघ्या १० ते १५ मिनिटानंतर अंतर पाहून जवळच्या मार्गाने तेथे पोहोचते. यानंतर आग विझविण्याची व संबंधितांना बाहेर सुखरूप काढण्याची मदत या विभागाकडून केली जाते. अत्यावश्यक सेवेतील यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत दिलेल्या आदेशाचे येथे पालन होते. यापूर्वी शहरात मागील दोन-तीन महिन्यांत पारवा रोड तसेच रेल्वे स्टेशन व अन्य काही ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेत ही यंत्रणा सज्ज असल्याचे वेळोवेळी दिसून आले.

अग्निशमन विभागप्रमुखाचा कोट

परभणी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अजून २ फायर स्टेशन व ४ वाहने तसेच ५० ते ६० कर्मचारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. सध्या १२ ते १५ कर्मचारी व तीन बंब सुसज्ज स्थितीत कार्यरत आहेत.

-दीपक कानोडे, अग्निशमन विभाग अधिकारी