शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोरोनाचे नियम डावलणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे निर्देश देण्यात आले ...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे, आवश्यक असतानाच घराबाहेर पडणे बंधनकारक केले आहे. मात्र नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

१७ मे रोजी पोलीस प्रशासनाने याविरुद्ध मोहीम राबवत कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली. त्यात मास्कचा वापर न करणाऱ्या ६३० नागरिकांकडून १ लाख २० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे कलम १८८चे उल्लंघन करणाऱ्या ८५ व्यावसायिकांकडून ७२ हजार ३०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. कोरोना संसर्ग काळातही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात २४६ वाहनचालकांवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. यात २ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तीनही कारवायांमध्ये मिळून २ लाख ५ हजार रुपयांचा दंड पोलीस प्रशासनाला वसूल केला.

दोन हजार नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या

जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्याची मोहीमही आरोग्य विभागाच्या मदतीने पोलिसांनी राबविली. दिवसभरात २ हजार २७८ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२५, नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४२३, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३००, ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४६, सेलू २५, मानवत २८६, जिंतूर २२२, गंगाखेड २७३, कोण २०५, पूर्णा १५२, पालम ४९ आणि चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ जणांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या आहेत.