शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना झालेल्या ५४ टक्के रुग्णांनी घेतली नव्हती लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST

परभणी : ऑगस्ट महिन्यात नोंद झालेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५४ टक्के रुग्णांनी लस घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. ...

परभणी : ऑगस्ट महिन्यात नोंद झालेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५४ टक्के रुग्णांनी लस घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे लसीकरण न करणे या रुग्णांसाठी महागात पडल्याचेच दिसत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण आणि मास्कचा वापर हे दोनच पर्याय असल्याचे आरोग्य विभागाकडून वारंवार सांगितले जात आहे. जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्नही केले जात आहेत. मात्र नागरिकांकडून लस घेण्यासाठी अनेक वेळा टंगळमंगळ केली जात आहे. त्यामुळे केव्हा कोरोनाचा संसर्ग होईल, हे सांगता येत नाही. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोरोना रुग्णसंख्येने शून्य गाठलेला नाही. त्यामुळे नागरिकांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यातच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनी देखील मास्कचा वापर करणे, लसीकरण करून घेणे या बाबी प्राधान्याने करणे गरजेचे आहे.

लस घेतल्यानंतर किती जणांना कोरोना झाला. याची पडताळणी केली असता, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण ५९ रुग्णांची नोंद झाली. या ५९ रुग्णांपैकी किती जणांनी लसीकरण करुन घेतले आहे, याची माहिती घेतली तेव्हा, ३२ रुग्ण असे आहेत, ज्यांनी कोरोनाची लस घेतली नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांपैकी ५४ टक्के रुग्णांनी लस घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णांनी लस घेतली असती तर कदाचित त्यांचे कोरोनापासून संरक्षण झाले असते. त्यामुळे कोरोनापासून सुरक्षित राहायचे असेल तर लसीकरण करणे आवश्यक झाले आहे.

३२ टक्के रुग्णांनी घेतला होता पहिला डोस

ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधित झालेल्या एकूण रुग्णांपैकी ३२ टक्के रुग्णांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यांना कोरोना झाला असला तरी त्याची तीव्रता अधिक नव्हती. ऑगस्ट महिन्यात नोंद झालेल्या ५९ रुग्णांपैकी १९ रुग्णांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. असे असताना त्यांना कोरोना संसर्ग झाला. मात्र त्याची तीव्रता अधिक नव्हती. कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी या रुग्णांना कोरोनातून बरे होण्यासाठी फारशा अडचणी झाल्या नाहीत.

लस घेऊनही १३ टक्के बाधित

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्याचे प्रमाण १३ टक्के एवढे अत्यल्प आहे. अनेक जण लसीकरण केल्यानंतर प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नाहीत. लस घेणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच महत्त्वाचे लसीकरण करून घेणे आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर देखील मास्कचा वापर, फिजिकल डिस्टंन्सचे पालन या नियमांचे पालन केल्यास कोरोनापासून दूर राहणे शक्य आहे. ऑगस्ट महिन्यात केवळ ८ रुग्णांना दोन्ही लस घेतल्यानंतर कोरोना झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यातील रुग्ण

एकूण रुग्ण : ५९

लस न घेतलेले रुग्ण : ३२

पहिला डोस घेतलेले रुग्ण : १३

दोन्ही डोस घेतलेले रुग्ण : ०८