शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
2
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
3
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
4
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
5
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
6
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
7
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
8
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
9
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
10
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
11
2026 Prediction: ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
13
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
14
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
15
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
16
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
17
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
18
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
19
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
20
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीत कापूस विक्रीसाठी शेतकरी आठ-आठ दिवस रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

सेलू : दोन दिवसांपासून हाडे गोठवणारा गारठा आहे. त्यातच आठ- आठ दिवस माप होत नाही. त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदी ...

सेलू : दोन दिवसांपासून हाडे गोठवणारा गारठा आहे. त्यातच आठ- आठ दिवस माप होत नाही. त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेकडो शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी आपल्या वाहनासह आठ- आठ दिवस रांगेत उभे आहेत. परिस्थितीचा फायदा घेऊन नव्याने कापूस खरेदीत उतरलेले खासगी व्यापारी रांगेत असलेल्या शेतकऱ्यांचा बेभाव कापूस खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी कापूस यार्डात १३३४ वाहनांची नोंद झाली होती.

१९ नोव्हेंबरपासून सीसीआयकडून शहरासह वालूर, देवगाव फाटा येथील एकूण ९ कापूस जिनिंगवर खरेदी केली जात आहे. किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली जात असल्याने कापूस उत्पादक शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या कापूस यार्ड परिसरात वाहनांची गर्दी झाली आहे. त्यातच मागील आठवड्यात सीसीआयच्या खरेदी केंद्रावरील जिनिंगवर कापूस साठविण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण देऊन पाच दिवस कापूस खरेदी बंद केली होती. परिणामी, पुन्हा वाहनांच्या संख्येत वाढ झाली. त्यातच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस सीसीआयकडून खरेदी केली जात नाही. त्यामुळे कापसाच्या वाहनांची अधिकच कोंडी वाढत आहे. सेलू तालुक्यासह इतर जिल्ह्यातून सेलूत कापूस विक्रीसाठी येत असल्याने मोठी गर्दी झाली आहे. सीसीआयकडून दररोज १२ हजार ते १३ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली जात आहे. खरेदी केलेला कापूस विविध जिनिंगवर पाठवला जातो. खरेदी केलेला कापसाची जिनिंग आणि विक्रीसाठी वाढलेला लोंढा याचा ताळमेळ बसत नसल्याने आठ- आठ दिवस कडाक्याच्या थंडीत शेतकरी वाहनासह कापूस यार्डात ताटकळत उभे आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी हेरून काही भांडवलदार व्यक्तींनी कापूस खरेदीत उडी घेतली आहे. शेतकऱ्यांकडून ५००० हजार रुपये क्विंटलने खरेदी करून तेच कापूस सीसीआयला ५ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटलने विक्री करून दररोज लाखोंचा नफा कमवत आहेत.

दोन्ही कापूस यार्ड फुल

शहरातील बाजार समितीचे दोन्ही कापूस यार्ड वाहनाने फुल झाले आहेत. त्यामुळे तहसील रोडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोमवारी १३३४ वाहने उभे होती. दुपारपर्यंत २०० वाहने सोडण्यात आले होते. दरम्यान, शेकडो शेतकऱ्यांना वाहन खर्चाचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागत असून गारठ्यात रात्र काढावी लागत आहे. दरम्यान, कापसाची आवक लक्षात घेता कापूस जिनिंगची क्षमता वाढविणे गरजे झाले आहे.