शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

कडाक्याच्या थंडीत कापूस विक्रीसाठी शेतकरी आठ-आठ दिवस रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

सेलू : दोन दिवसांपासून हाडे गोठवणारा गारठा आहे. त्यातच आठ- आठ दिवस माप होत नाही. त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदी ...

सेलू : दोन दिवसांपासून हाडे गोठवणारा गारठा आहे. त्यातच आठ- आठ दिवस माप होत नाही. त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेकडो शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी आपल्या वाहनासह आठ- आठ दिवस रांगेत उभे आहेत. परिस्थितीचा फायदा घेऊन नव्याने कापूस खरेदीत उतरलेले खासगी व्यापारी रांगेत असलेल्या शेतकऱ्यांचा बेभाव कापूस खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी कापूस यार्डात १३३४ वाहनांची नोंद झाली होती.

१९ नोव्हेंबरपासून सीसीआयकडून शहरासह वालूर, देवगाव फाटा येथील एकूण ९ कापूस जिनिंगवर खरेदी केली जात आहे. किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली जात असल्याने कापूस उत्पादक शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या कापूस यार्ड परिसरात वाहनांची गर्दी झाली आहे. त्यातच मागील आठवड्यात सीसीआयच्या खरेदी केंद्रावरील जिनिंगवर कापूस साठविण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण देऊन पाच दिवस कापूस खरेदी बंद केली होती. परिणामी, पुन्हा वाहनांच्या संख्येत वाढ झाली. त्यातच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस सीसीआयकडून खरेदी केली जात नाही. त्यामुळे कापसाच्या वाहनांची अधिकच कोंडी वाढत आहे. सेलू तालुक्यासह इतर जिल्ह्यातून सेलूत कापूस विक्रीसाठी येत असल्याने मोठी गर्दी झाली आहे. सीसीआयकडून दररोज १२ हजार ते १३ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली जात आहे. खरेदी केलेला कापूस विविध जिनिंगवर पाठवला जातो. खरेदी केलेला कापसाची जिनिंग आणि विक्रीसाठी वाढलेला लोंढा याचा ताळमेळ बसत नसल्याने आठ- आठ दिवस कडाक्याच्या थंडीत शेतकरी वाहनासह कापूस यार्डात ताटकळत उभे आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी हेरून काही भांडवलदार व्यक्तींनी कापूस खरेदीत उडी घेतली आहे. शेतकऱ्यांकडून ५००० हजार रुपये क्विंटलने खरेदी करून तेच कापूस सीसीआयला ५ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटलने विक्री करून दररोज लाखोंचा नफा कमवत आहेत.

दोन्ही कापूस यार्ड फुल

शहरातील बाजार समितीचे दोन्ही कापूस यार्ड वाहनाने फुल झाले आहेत. त्यामुळे तहसील रोडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोमवारी १३३४ वाहने उभे होती. दुपारपर्यंत २०० वाहने सोडण्यात आले होते. दरम्यान, शेकडो शेतकऱ्यांना वाहन खर्चाचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागत असून गारठ्यात रात्र काढावी लागत आहे. दरम्यान, कापसाची आवक लक्षात घेता कापूस जिनिंगची क्षमता वाढविणे गरजे झाले आहे.