शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

अतिवृष्टीच्या तडाख्यात शेतकरी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख १७ हजार तर रबी हंगामात २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर ४ लाख ६४ ...

जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख १७ हजार तर रबी हंगामात २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर ४ लाख ६४ हजार ७८३ शेतकरी पेरणी करतात. २०१९-२० या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. त्यासाठी जवळपास ९०० कोटी रुपयांचा खर्च केला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत बहरलेल्या पिकातून यावर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिके मातीमाेल झाली. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले. त्यासाठी राज्य शासनाकडे १०८ कोटी रुपयांची मागणी नोंदविली. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात केवळ ९० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही ९० कोटींची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत संरक्षित केली होती. त्यासाठी ३२ कोटी ९० लाख रुपयांचा विमा हप्ताही भरला होता. मात्र, या विमा कंपनीने १८ हजार शेतकऱ्यांना केवळ ११ कोटी रुपयांची तुटपुंजी मदत केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ना विमा कंपनीने मदत केली ना शासनाने. त्यामुळे शेतकरी या वर्षाअखेरीस तरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात विक्रमी १०४ टक्के पाऊस

जिल्ह्यात यावर्षी जूनपासून सर्वसाधारण पाऊस होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. परिणामी जिल्ह्यात ऑक्टोबरपर्यंत ९०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने खरिपाचे नुकसान केले असले तरी रबी हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरला. तसेच जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी व जायकवाडी हे मुख्य प्रकल्प अनेक वषार्नंतर तुडुंब भरून वाहिले. ही एकमेव समाधानकारक बाब शेतकऱ्यांसाठी ठरली.