शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या तडाख्यात शेतकरी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख १७ हजार तर रबी हंगामात २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर ४ लाख ६४ ...

जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख १७ हजार तर रबी हंगामात २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर ४ लाख ६४ हजार ७८३ शेतकरी पेरणी करतात. २०१९-२० या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. त्यासाठी जवळपास ९०० कोटी रुपयांचा खर्च केला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत बहरलेल्या पिकातून यावर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिके मातीमाेल झाली. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले. त्यासाठी राज्य शासनाकडे १०८ कोटी रुपयांची मागणी नोंदविली. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात केवळ ९० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही ९० कोटींची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत संरक्षित केली होती. त्यासाठी ३२ कोटी ९० लाख रुपयांचा विमा हप्ताही भरला होता. मात्र, या विमा कंपनीने १८ हजार शेतकऱ्यांना केवळ ११ कोटी रुपयांची तुटपुंजी मदत केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ना विमा कंपनीने मदत केली ना शासनाने. त्यामुळे शेतकरी या वर्षाअखेरीस तरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात विक्रमी १०४ टक्के पाऊस

जिल्ह्यात यावर्षी जूनपासून सर्वसाधारण पाऊस होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. परिणामी जिल्ह्यात ऑक्टोबरपर्यंत ९०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने खरिपाचे नुकसान केले असले तरी रबी हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरला. तसेच जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी व जायकवाडी हे मुख्य प्रकल्प अनेक वषार्नंतर तुडुंब भरून वाहिले. ही एकमेव समाधानकारक बाब शेतकऱ्यांसाठी ठरली.