शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या तडाख्यात शेतकरी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख १७ हजार तर रबी हंगामात २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर ४ लाख ६४ ...

जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख १७ हजार तर रबी हंगामात २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर ४ लाख ६४ हजार ७८३ शेतकरी पेरणी करतात. २०१९-२० या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. त्यासाठी जवळपास ९०० कोटी रुपयांचा खर्च केला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत बहरलेल्या पिकातून यावर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिके मातीमाेल झाली. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले. त्यासाठी राज्य शासनाकडे १०८ कोटी रुपयांची मागणी नोंदविली. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात केवळ ९० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही ९० कोटींची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत संरक्षित केली होती. त्यासाठी ३२ कोटी ९० लाख रुपयांचा विमा हप्ताही भरला होता. मात्र, या विमा कंपनीने १८ हजार शेतकऱ्यांना केवळ ११ कोटी रुपयांची तुटपुंजी मदत केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ना विमा कंपनीने मदत केली ना शासनाने. त्यामुळे शेतकरी या वर्षाअखेरीस तरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात विक्रमी १०४ टक्के पाऊस

जिल्ह्यात यावर्षी जूनपासून सर्वसाधारण पाऊस होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. परिणामी जिल्ह्यात ऑक्टोबरपर्यंत ९०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने खरिपाचे नुकसान केले असले तरी रबी हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरला. तसेच जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी व जायकवाडी हे मुख्य प्रकल्प अनेक वषार्नंतर तुडुंब भरून वाहिले. ही एकमेव समाधानकारक बाब शेतकऱ्यांसाठी ठरली.