शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

अतिवृष्टीच्या तडाख्यात शेतकरी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख १७ हजार तर रबी हंगामात २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर ४ लाख ६४ ...

जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख १७ हजार तर रबी हंगामात २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर ४ लाख ६४ हजार ७८३ शेतकरी पेरणी करतात. २०१९-२० या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. त्यासाठी जवळपास ९०० कोटी रुपयांचा खर्च केला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत बहरलेल्या पिकातून यावर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिके मातीमाेल झाली. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले. त्यासाठी राज्य शासनाकडे १०८ कोटी रुपयांची मागणी नोंदविली. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात केवळ ९० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही ९० कोटींची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत संरक्षित केली होती. त्यासाठी ३२ कोटी ९० लाख रुपयांचा विमा हप्ताही भरला होता. मात्र, या विमा कंपनीने १८ हजार शेतकऱ्यांना केवळ ११ कोटी रुपयांची तुटपुंजी मदत केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ना विमा कंपनीने मदत केली ना शासनाने. त्यामुळे शेतकरी या वर्षाअखेरीस तरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात विक्रमी १०४ टक्के पाऊस

जिल्ह्यात यावर्षी जूनपासून सर्वसाधारण पाऊस होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. परिणामी जिल्ह्यात ऑक्टोबरपर्यंत ९०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने खरिपाचे नुकसान केले असले तरी रबी हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरला. तसेच जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी व जायकवाडी हे मुख्य प्रकल्प अनेक वषार्नंतर तुडुंब भरून वाहिले. ही एकमेव समाधानकारक बाब शेतकऱ्यांसाठी ठरली.