शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

राज्यातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात : परभणीत पत्रकार परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:41 IST

फसवी कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हे सरकारचे अपयश असून शेतकºयांच्या हक्कासाठी २३ मार्चपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : फसवी कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हे सरकारचे अपयश असून शेतकºयांच्या हक्कासाठी २३ मार्चपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी दिली.येथील सावली विश्रामगृहावर २३ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रघुनाथ पाटील यांच्यासह सुकाणू समितीतील सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, किसान सभेचे विलास बाबर, अ‍ॅड.राजन क्षीरसागर, बंडू सोळंके, अमृतराव शिंदे, लिंबाजी कचरे, बालासाहेब आळणे, माऊली कदम, सलीम शेख, प्रल्हाद जाधव, रामराजे महाडिक, मुंजाभाऊ कदम, नारायण आवचार, मोहन मानोलीकर आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी १६ फेब्रुवारीपासून सांगली येथून पायलट दौरा सुरु करण्यात आला आहे. सरसगट कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शासनाने शब्द फिरविला. बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना अद्यापही मदत मिळाली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कर्ज, कर, वीज बिल भरु शकत नाही. त्यामुळे २३ मार्चपासून असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. किशोर ढबाले म्हणाले, २३ मार्च रोजी हुतात्मा अभिवादन शेतकरी शहीद स्मृती दिवसापासून इस्मालपूर येथून जागर यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिल रोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.हमीभाव न देता शेतकºयांची लूटराज्य शासनामार्फत नुसते निर्णय घेऊन शेतकºयांची फसवणूक केली जात आहे. प्रत्येक शेतमालाला हमीभाव जाहीर केला जातो. परंतु, प्रत्यक्षात हा हमीभाव मिळत नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणे गुन्हा असताना याविरुद्ध कारवाई होत नाही. मागील आंदोलनाच्या वेळी दुधाला हमीभाव जाहीर करण्यात आला. परंतु, आतापर्यंत या हमीभावाने दुधाची खरेदी झाली नाही. परिणामी राज्यातील शेतकºयांची ४ हजार २०० कोटी रुपयांची लूट झाली. शासनाला शेतकºयांविषयी गांभीर्य नसल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.