महापालिकेच्या वतीने ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांकडून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे़. तसेच नागरिकांसाठी विलंब शास्ती १०० टक्के सूट अभय योजना लागू केली आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टी कर विलंब शास्तीत ३१ ऑगस्टपर्यंत थकीत व चालू कर एकरकमी भरल्यास मागणी बिलातून विलंब शास्तीत १०० टक्के सूट देण्यात येत आहे़ १ सप्टेंबरनंतर हा लाभ दिला जाणार नाही़ नागरिकांनी थकीत व चालू वर्षातील कर वसुली लिपिक यांच्याकडे तसेच प्रभाग समिती अ, ब, क कार्यालयात करावा. याशिवाय महापालिकेच्या मागणी बिलावरील क्यूआर कोड या लिंकवर ऑनलाइन नेट बँकिंगद्वारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि क्यूआर कोडद्वारे मालमत्ता करात भरणा करावा़ कर भरणा न केल्यास महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील अनुसूची ड चे प्रकरण ८ कराधान नियम क्रमांक ४२ अन्वये जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त प्रदीप जगताप यांनी कळविले आहे.
कर न भरल्यास होणार जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST