शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:19 IST

जिल्ह्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. या योजनेची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु, शेतकºयांचा वाढता प्रतिसाद पाहता या योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. या योजनेची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु, शेतकºयांचा वाढता प्रतिसाद पाहता या योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.जिल्ह्यात महावितरणचे जवळपास २ लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांपैकी ९२ हजार ग्राहक हे कृषीपंपधारक आहेत. त्यापैकी ९० हजार ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ७५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. या योजनेत ज्या थकबाकीदार शेतकºयांनी सहभाग घेतला आहे. त्या कृषीपंप धारकांची थकबाकी ३० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास ती थकबाकी १० समान हप्त्यामध्ये प्रत्येक दीड महिन्याच्या कालावधीत भरणा करावी लागणार आहे. यामध्ये पाच हप्ते देण्यात येणार आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी कृषीपंपधारकाला चालू महिन्याचे वीज बिल भरुन डिसेंबरपासून मूळ थकबाकीपैकी २० टक्के पहिला हप्ता भरावा लागणार आहे. त्यानंतर मार्च, जून, सप्टेंबर व डिसेंबर २०१८ पर्यंत प्रत्येकी २० टक्क्यासह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावी लागणार आहे. जिल्ह्यातील कृषीपंपधारकांचा वाढता सहभाग पाहता नांदेड परिमंडळात शनिवारी झालेल्या बैठकीत या योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. थकबाकीदार कृषीपंपधारकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले.