शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

प्रत्येक गावाला मिळणार नळाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST

परभणी: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ‘हर घर नल से जल’ ही योजना हाती ...

परभणी: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ‘हर घर नल से जल’ ही योजना हाती घेण्यात आली असून प्रत्येक गावाला नळाचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन प्रस्तावित आराखड्याची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ.बाबाजानी दुर्राणी, आ.सुरेश वरपूडकर, आ.डॉ.राहुल पाटील, आ.रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि.प.चे मुख्य अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रत्येक व्यक्तीला दरदिवशी किमान ५५ लिटर पाणी मिळाले पाहिजे. तसेच शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ही पाणीपुरवठा योजना आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन मलिक यांनी यावेळी केले. जिल्ह्यासाठी ६८ हजार ६०४ नळ जोडण्यांंचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ७२ हजार ३९ नळजोडण्यांची नोंद संकेतस्थळावर झाली आहे. नळजोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात जलजीवन मिशनअंतर्गत ३५ योजना मंजूर आहेत. त्यापैकी ७५ ते १०० टक्के काम झालेल्या ९ योजना आहेत. ५० ते ७५ टक्क्यांमध्ये ४, २५ ते ५० टक्क्यांमध्ये ३ आणि ० ते २५ टक्क्यांमध्ये १६ योजना आहेत. त्यापैकी १८ योजनेद्वारे गावांना पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली.

२०५ गावांना दरडोई ५५ लिटर पाणी

जलजीवन मिशनअंतर्गत २०२०-२१ चा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात २०५ गावांना ५५ लिटर दरडोई पाणी उपलब्ध होत आहे. ही गावे अ वर्गात आहेत. तसेच ४० ते ४५ लिटर पाणी उपलब्ध होणारी ३१३, ४० लिटरपेक्षा कमी पाणी उपलब्ध होणारी १४० गावे आहेत. अ वर्गवारीमधील ५१८ पैकी १५४ गावांचे ६ कोटी २५ लाख १४ हजार रुपयांचे अंदाजपत्रके तयार आहेत. ब वर्गवारीमधील ९ गावांचे २० लाख ३ हजार रुपये किमतीचे अंदाजपत्रक तयार आहे. संकेतस्थळावर नोंद नसलेल्या ४६ गावांपैकी ७ गावांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून २ कोटी ८७ लाख ४५ हजार रुपये या अंदाजपत्रकांची प्रस्तावित किंमत असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.