शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

सचिवांच्या आदेशानंतरही अतिक्रमण हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:22 IST

शहरातील जिंतूर रोड भागातील ईदगाह मैदानावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणातून आर्थिक वसुली केली जात आहे. त्यामुळे ...

शहरातील जिंतूर रोड भागातील ईदगाह मैदानावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणातून आर्थिक वसुली केली जात आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सचिवांकडे शहरातील काही नागरिकांनी केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सचिवांनी औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना १ ऑक्टोबर रोजी पत्र पाठविले आहे. त्यात परभणी शहरातील ईदगाह मैदानावरील अतिक्रमण हटविण्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश देऊनही अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. तसेच या प्रकरणी कार्यवाही न करता जाणीवपूर्वक वेळकाढूपणा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यास्तव सदरील प्रकरणी आपल्या स्तरावरून कार्यवाही करून त्याबाबत संबंधितास अवगत करावे, असेही या पत्रात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सचिव एस. सी. तडवी यांनी म्हटले आहे. हे पत्र येऊन जवळपास ३ महिन्यांचा कालावधी होत आला तरी याप्रकरणी कसल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वक्फ बोर्डाच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाचे एवढी उदासीनता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.