शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण, अपहाराचे प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST

परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी विविध प्रश्न घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यात ...

परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी विविध प्रश्न घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यात अपहार, अतिक्रमण या प्रश्नांसह वैयक्तिक प्रश्नांचाही समावेश आहे.

न्याय देण्याची मागणी

शिक्षित मुलांवर विनाकारण खोटे गुन्हे दाखल करणे बंद करावे, या मागणीसाठी गव्हा येथील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पारधी समाजाचे हे ग्रामस्थ आहेत. आमच्या समाजात गुन्हेगारी राहिली नाही. मात्र, तरीही आम्हांला विनाकारण त्रास दिला जात आहे. तेव्हा गुन्हा केलेला नसताना त्रास दिला जाऊ नये. विनाकारण त्रास देणे, धमक्या देणे थांबवावे आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. गव्हा येथील हरणाबाई पवार, गयाबाई काळे, विठाबाई पवार, समाबाई काळे, मंगल पवार, शांताबाई काळे, गंगूबाई काळे आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.

अपहाराच्या चौकशीची मागणी

तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील उपसरपंच अर्जुन सामाले यांनीही अपहाराच्या चौकशीसाठी उपोषण सुरू केले आहे, ग्रामपंचायतीच्या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असून, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

सातवा वेतन आयोग लागू करा

राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विलीन करून सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच प्रत्येक महिन्याला वेतन अदा करावे, कर्मचाऱ्यांना काम नसल्यास हजेरी द्यावी, थकीत महागाई भत्ता एकरकमी द्यावा आदी मागण्यांसाठी उद्धव वाकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

जमिनीच्या हक्कासाठी उपोषण

वडिलोपार्जित जमिनीपैकी नावावर असलेली ४ एकर जमीन परस्पर इतरांच्या नावे केली असून, ती परत करावी, या मागणीसाठी पालम तालुक्यातील खडी येथील व्यंकटेश आकनगिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. व्यंकटेश आकनगिरे हे कायदेशीर वारस असतानाही त्यांना जमीन व घराचा हिस्सा मिळवून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

कारवाईच्या मागणीसाठी उपोषण

परभणी तालुक्यातील दैठणा येथील अनंत कच्छवे यांनीही १६ सप्टेंबरवपासून उपोषण सुरू केले आहे. ग्रामविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत लिपीक यांच्यावर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. दैठणा येथील बोगस कामांची चौकशी करावी, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाई करावी, अशीही त्यांची मागणी आहे.

अतिक्रमण हटविण्याची मागणी

पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी अशोक अंबोरे व इतरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शासनाची दिशाभूल करून गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करीत हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.