शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण, अपहाराचे प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST

परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी विविध प्रश्न घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यात ...

परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी विविध प्रश्न घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यात अपहार, अतिक्रमण या प्रश्नांसह वैयक्तिक प्रश्नांचाही समावेश आहे.

न्याय देण्याची मागणी

शिक्षित मुलांवर विनाकारण खोटे गुन्हे दाखल करणे बंद करावे, या मागणीसाठी गव्हा येथील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पारधी समाजाचे हे ग्रामस्थ आहेत. आमच्या समाजात गुन्हेगारी राहिली नाही. मात्र, तरीही आम्हांला विनाकारण त्रास दिला जात आहे. तेव्हा गुन्हा केलेला नसताना त्रास दिला जाऊ नये. विनाकारण त्रास देणे, धमक्या देणे थांबवावे आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. गव्हा येथील हरणाबाई पवार, गयाबाई काळे, विठाबाई पवार, समाबाई काळे, मंगल पवार, शांताबाई काळे, गंगूबाई काळे आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.

अपहाराच्या चौकशीची मागणी

तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील उपसरपंच अर्जुन सामाले यांनीही अपहाराच्या चौकशीसाठी उपोषण सुरू केले आहे, ग्रामपंचायतीच्या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असून, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

सातवा वेतन आयोग लागू करा

राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विलीन करून सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच प्रत्येक महिन्याला वेतन अदा करावे, कर्मचाऱ्यांना काम नसल्यास हजेरी द्यावी, थकीत महागाई भत्ता एकरकमी द्यावा आदी मागण्यांसाठी उद्धव वाकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

जमिनीच्या हक्कासाठी उपोषण

वडिलोपार्जित जमिनीपैकी नावावर असलेली ४ एकर जमीन परस्पर इतरांच्या नावे केली असून, ती परत करावी, या मागणीसाठी पालम तालुक्यातील खडी येथील व्यंकटेश आकनगिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. व्यंकटेश आकनगिरे हे कायदेशीर वारस असतानाही त्यांना जमीन व घराचा हिस्सा मिळवून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

कारवाईच्या मागणीसाठी उपोषण

परभणी तालुक्यातील दैठणा येथील अनंत कच्छवे यांनीही १६ सप्टेंबरवपासून उपोषण सुरू केले आहे. ग्रामविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत लिपीक यांच्यावर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. दैठणा येथील बोगस कामांची चौकशी करावी, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाई करावी, अशीही त्यांची मागणी आहे.

अतिक्रमण हटविण्याची मागणी

पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी अशोक अंबोरे व इतरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शासनाची दिशाभूल करून गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करीत हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.