शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोंबड्यांच्या मृत्यूनंतर सर्वेक्षणावर दिला भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:41 IST

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर बर्ड फ्ल्यू या साथीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात ...

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर बर्ड फ्ल्यू या साथीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

तालुक्यातील मुरुंबा येथे ७ आणि ८ जानेवारी रोजी एकाच पोल्ट्री फॉर्ममधील ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पशुसंवर्धन विभाग आणि शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी तातडीने मुरुंबा येथे जावून मृत कोंबड्यांची तपासणी केली. या कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, घटनेनंतर लगेच मुंबई आणि परिसरातील १० कि. मी. अंतरातील गावांत सर्वेक्षण करण्यात आले, त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात अशा पद्धतीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. बर्ड फ्ल्यू आजार नेमका काय आहे? या आजारात पक्ष्यांना दिसणारी लक्षणे, त्यावर करावयाचे उपाय याविषयीची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात रविवारी पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन या काळात काय काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली. तसेच पुन्हा एकदा प्रत्येक गावात सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश सावणे, डॉ. श्रीनिवास कारले यांनी हे प्रशिक्षण दिले.

पक्ष्यांच्या खरेदी-विक्रीस प्रतिबंध

तालुक्यातील मुरुंबा येथे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने या गावशिवारापासून ५ कि.मी. परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वातहूक, बाजार, जत्रा आणि प्रदर्शन भरविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.

आरआरटी पथकांची स्थापना

या घटनेनंतर पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन केली आहे. हे पथक जिल्ह्यातील प्रत्येक गावास भेट देऊन कुक्कुट पक्ष्यांची माहिती घेणार आहे. त्याचप्रमाणे बर्ड फ्ल्यूसंदर्भात माहिती आढळल्यास तातडीने कारवाई करणार आहे. या पथकामध्ये पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेच्या बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहात या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

राज्यात बर्ड फ्ल्यू या साथीचा प्रसार होत असल्याने त्याचा प्रतिबंध करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून, दररोज जिल्ह्यात मृतक पक्ष्यांची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करण्यासाठी सज्ज आहे.

डॉ.प्रकाश सवणे, पशुधन विकास अधिकारी