शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कोंबड्यांच्या मृत्यूनंतर सर्वेक्षणावर दिला भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:41 IST

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर बर्ड फ्ल्यू या साथीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात ...

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर बर्ड फ्ल्यू या साथीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

तालुक्यातील मुरुंबा येथे ७ आणि ८ जानेवारी रोजी एकाच पोल्ट्री फॉर्ममधील ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पशुसंवर्धन विभाग आणि शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी तातडीने मुरुंबा येथे जावून मृत कोंबड्यांची तपासणी केली. या कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, घटनेनंतर लगेच मुंबई आणि परिसरातील १० कि. मी. अंतरातील गावांत सर्वेक्षण करण्यात आले, त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात अशा पद्धतीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. बर्ड फ्ल्यू आजार नेमका काय आहे? या आजारात पक्ष्यांना दिसणारी लक्षणे, त्यावर करावयाचे उपाय याविषयीची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात रविवारी पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन या काळात काय काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली. तसेच पुन्हा एकदा प्रत्येक गावात सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश सावणे, डॉ. श्रीनिवास कारले यांनी हे प्रशिक्षण दिले.

पक्ष्यांच्या खरेदी-विक्रीस प्रतिबंध

तालुक्यातील मुरुंबा येथे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने या गावशिवारापासून ५ कि.मी. परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वातहूक, बाजार, जत्रा आणि प्रदर्शन भरविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.

आरआरटी पथकांची स्थापना

या घटनेनंतर पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन केली आहे. हे पथक जिल्ह्यातील प्रत्येक गावास भेट देऊन कुक्कुट पक्ष्यांची माहिती घेणार आहे. त्याचप्रमाणे बर्ड फ्ल्यूसंदर्भात माहिती आढळल्यास तातडीने कारवाई करणार आहे. या पथकामध्ये पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेच्या बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहात या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

राज्यात बर्ड फ्ल्यू या साथीचा प्रसार होत असल्याने त्याचा प्रतिबंध करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून, दररोज जिल्ह्यात मृतक पक्ष्यांची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करण्यासाठी सज्ज आहे.

डॉ.प्रकाश सवणे, पशुधन विकास अधिकारी