शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आठ महिन्यांनंतर शिक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:47 IST

जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या निर्णयानुसार २ डिसेंबरपासून मनपा हद्द वगळता ग्रामीण ...

जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या निर्णयानुसार २ डिसेंबरपासून मनपा हद्द वगळता ग्रामीण भागातील दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे शाळेचा हा पहिला दिवस विद्यार्थी, शिक्षकांसाठी उत्साहवर्धक ठरला. फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझेशनचे नियम पाळत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर उभे राहून शिक्षकांनी शिकविण्यास प्रारंभ केला. कोरोनाच्या संकटानंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आपला वर्ग, आपला बेंच, बसण्याची जागा विद्यार्थ्यांनी नव्याने अनुभवली. यावेळी विद्यार्थ्यांचे कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावरून लपत नसल्याने काही शाळांना भेटी दिल्यानंतर दिसून आले.

कोणत्या शाळेत काय अनुभव आले

शांताबाई नखाते विद्यालय, देवगाव फाटा

सकाळी ११.४० वाजता शाळेला भेट दिली, तेव्हा दहावीचा वर्ग सुरू होता. १४० पैकी ४२ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. एका वर्गात २१ या पद्धतीने दोन वर्गात फिजिकल डिस्टन्सनुसार विद्यार्थी बसलेले होते. एका वर्गात हुगे हे शिक्षक गणित विषय शिकवीत होते, तर दुसऱ्या वर्गात बालाजी पडोळे हे विज्ञान विषय शिकवीत होते. शाळेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल गनच्या साह्याने तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दररोज चार तास शाळा भरविली जाणार असल्याचे मुख्याध्यापक प्रल्हाद शहारे यांनी सांगितले.

अन्नपूर्णा कनिष्ठ महाविद्यालयास दुपारी १२.४५ च्या सुमारास भेट दिली असता एका वर्गात १२ विद्यार्थी उपस्थित होते. बारावी विज्ञान शाखेत ५३ विद्यार्थी आहेत. पालकांनी संमती दिलेले १४ विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित झाले होते. थर्मल गनच्या साह्याने तपासणी करण्यात आली. दोन विद्यार्थ्यांना सर्दीची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांना परत पाठविले, असे प्राचार्य एन.एस. उबाळे यांनी सांगितले.

शकुंतला कत्रुवार विद्यालय, मानवत

या शाळेत सकाळी १० वाजेच्या सुमारास भेट दिली तेव्हा दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होते. दहावीच्या तीन तुकड्यांमध्ये १७६ विद्यार्थिसंख्या आहे. केवळ ६२ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. याच वेळी शिक्षणाधिकारी वंदना वाहूळ या देखील शाळेत पाहणीसाठी दाखल झाल्या होत्या. कोरोनाच्या अनुषंगाने त्यांनी शाळेने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.