शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

आठ महिन्यांनंतर शिक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:47 IST

जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या निर्णयानुसार २ डिसेंबरपासून मनपा हद्द वगळता ग्रामीण ...

जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या निर्णयानुसार २ डिसेंबरपासून मनपा हद्द वगळता ग्रामीण भागातील दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे शाळेचा हा पहिला दिवस विद्यार्थी, शिक्षकांसाठी उत्साहवर्धक ठरला. फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझेशनचे नियम पाळत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर उभे राहून शिक्षकांनी शिकविण्यास प्रारंभ केला. कोरोनाच्या संकटानंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आपला वर्ग, आपला बेंच, बसण्याची जागा विद्यार्थ्यांनी नव्याने अनुभवली. यावेळी विद्यार्थ्यांचे कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावरून लपत नसल्याने काही शाळांना भेटी दिल्यानंतर दिसून आले.

कोणत्या शाळेत काय अनुभव आले

शांताबाई नखाते विद्यालय, देवगाव फाटा

सकाळी ११.४० वाजता शाळेला भेट दिली, तेव्हा दहावीचा वर्ग सुरू होता. १४० पैकी ४२ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. एका वर्गात २१ या पद्धतीने दोन वर्गात फिजिकल डिस्टन्सनुसार विद्यार्थी बसलेले होते. एका वर्गात हुगे हे शिक्षक गणित विषय शिकवीत होते, तर दुसऱ्या वर्गात बालाजी पडोळे हे विज्ञान विषय शिकवीत होते. शाळेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल गनच्या साह्याने तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दररोज चार तास शाळा भरविली जाणार असल्याचे मुख्याध्यापक प्रल्हाद शहारे यांनी सांगितले.

अन्नपूर्णा कनिष्ठ महाविद्यालयास दुपारी १२.४५ च्या सुमारास भेट दिली असता एका वर्गात १२ विद्यार्थी उपस्थित होते. बारावी विज्ञान शाखेत ५३ विद्यार्थी आहेत. पालकांनी संमती दिलेले १४ विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित झाले होते. थर्मल गनच्या साह्याने तपासणी करण्यात आली. दोन विद्यार्थ्यांना सर्दीची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांना परत पाठविले, असे प्राचार्य एन.एस. उबाळे यांनी सांगितले.

शकुंतला कत्रुवार विद्यालय, मानवत

या शाळेत सकाळी १० वाजेच्या सुमारास भेट दिली तेव्हा दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होते. दहावीच्या तीन तुकड्यांमध्ये १७६ विद्यार्थिसंख्या आहे. केवळ ६२ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. याच वेळी शिक्षणाधिकारी वंदना वाहूळ या देखील शाळेत पाहणीसाठी दाखल झाल्या होत्या. कोरोनाच्या अनुषंगाने त्यांनी शाळेने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.