शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

खाद्यतेलाचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:13 IST

जिंतूर : अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेतील सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने ...

जिंतूर : अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेतील सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने गरिबांच्या घरातील फोडणी बंद होण्याची वेळ आली आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची आवक झाली नाही. त्याचा परिणाम आता खाद्यतेलावर दिसून येत आहे. देशात ७० टक्के खाद्यतेल विदेशातून आयात केले जात आहे. तर दुसरीकडे, ३० टक्के तेलच देशात तयार होत आहे. तसेच कोरोना संकटामुळे यावर्षी खाद्यतेलाची विदेशातून होणारी आयात ठप्प आहे तर दुसरीकडे केंद्र शासनाने आयात शुल्कही भरमसाठ वाढविले आहे. त्याचा परिणाम म्हणून १५ लिटरचा सोयाबीन तेलाचा डब्बा पूर्वी १५०० रुपयांपर्यंत मिळत होता. आता २ हजार रुपयांच्या घरात गेला आहे. सरकीच्या तेलाचा दरही ११५ रुपये प्रतिकिलोवर जावून पोहोचला आहे. सूर्यफूल १३५, पामतेल १२५ तर सोयाबीन १४० तर शेंगदाणा तेल १८० रुपये किलो जावून पोहोचले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेत खाद्यतेलाची होत असलेली भाववाढ सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक बोजा टाकणारी ठरत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

तांदळाच्या भावातही वाढ

जिंतूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तांदळाला मागणी असते. जुन्या तांदळाची मागणी ग्रहाकांकडून वाढत असल्याने बाजारपेठेत तांदळाची झालेली भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. नवीन तांदूळ बाजारात आल्यानंतर भाव कमी होतील, अशी अपेक्षा असली तरी सद्यस्थितीत ४ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपयांवर प्रतिक्विंटल तांदळाचा भाव गेला आहे. त्यामुळे खाद्यतेलाबरोबरच तांदूळही महागल्याने संक्रांतीचा सण नागरिकांना महागाईच्या दिवसातच साजरा करावा लागणार आहे.

यावर्षीच्या वातावरणातील बदल तसेच इतर देशांमध्ये झालेले तेलबियांचे नुकसान त्यामुळे रिफाईंड तेलाची बाजारात टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे येत्या महिन्यात ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

गोपाळ चिद्रवार, होलसेल विक्रेते, जिंतूर