शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:13 IST

जिंतूर : अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेतील सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने ...

जिंतूर : अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेतील सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने गरिबांच्या घरातील फोडणी बंद होण्याची वेळ आली आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची आवक झाली नाही. त्याचा परिणाम आता खाद्यतेलावर दिसून येत आहे. देशात ७० टक्के खाद्यतेल विदेशातून आयात केले जात आहे. तर दुसरीकडे, ३० टक्के तेलच देशात तयार होत आहे. तसेच कोरोना संकटामुळे यावर्षी खाद्यतेलाची विदेशातून होणारी आयात ठप्प आहे तर दुसरीकडे केंद्र शासनाने आयात शुल्कही भरमसाठ वाढविले आहे. त्याचा परिणाम म्हणून १५ लिटरचा सोयाबीन तेलाचा डब्बा पूर्वी १५०० रुपयांपर्यंत मिळत होता. आता २ हजार रुपयांच्या घरात गेला आहे. सरकीच्या तेलाचा दरही ११५ रुपये प्रतिकिलोवर जावून पोहोचला आहे. सूर्यफूल १३५, पामतेल १२५ तर सोयाबीन १४० तर शेंगदाणा तेल १८० रुपये किलो जावून पोहोचले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेत खाद्यतेलाची होत असलेली भाववाढ सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक बोजा टाकणारी ठरत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

तांदळाच्या भावातही वाढ

जिंतूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तांदळाला मागणी असते. जुन्या तांदळाची मागणी ग्रहाकांकडून वाढत असल्याने बाजारपेठेत तांदळाची झालेली भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. नवीन तांदूळ बाजारात आल्यानंतर भाव कमी होतील, अशी अपेक्षा असली तरी सद्यस्थितीत ४ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपयांवर प्रतिक्विंटल तांदळाचा भाव गेला आहे. त्यामुळे खाद्यतेलाबरोबरच तांदूळही महागल्याने संक्रांतीचा सण नागरिकांना महागाईच्या दिवसातच साजरा करावा लागणार आहे.

यावर्षीच्या वातावरणातील बदल तसेच इतर देशांमध्ये झालेले तेलबियांचे नुकसान त्यामुळे रिफाईंड तेलाची बाजारात टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे येत्या महिन्यात ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

गोपाळ चिद्रवार, होलसेल विक्रेते, जिंतूर