शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

खाद्यतेलाचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:13 IST

जिंतूर : अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेतील सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने ...

जिंतूर : अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेतील सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने गरिबांच्या घरातील फोडणी बंद होण्याची वेळ आली आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची आवक झाली नाही. त्याचा परिणाम आता खाद्यतेलावर दिसून येत आहे. देशात ७० टक्के खाद्यतेल विदेशातून आयात केले जात आहे. तर दुसरीकडे, ३० टक्के तेलच देशात तयार होत आहे. तसेच कोरोना संकटामुळे यावर्षी खाद्यतेलाची विदेशातून होणारी आयात ठप्प आहे तर दुसरीकडे केंद्र शासनाने आयात शुल्कही भरमसाठ वाढविले आहे. त्याचा परिणाम म्हणून १५ लिटरचा सोयाबीन तेलाचा डब्बा पूर्वी १५०० रुपयांपर्यंत मिळत होता. आता २ हजार रुपयांच्या घरात गेला आहे. सरकीच्या तेलाचा दरही ११५ रुपये प्रतिकिलोवर जावून पोहोचला आहे. सूर्यफूल १३५, पामतेल १२५ तर सोयाबीन १४० तर शेंगदाणा तेल १८० रुपये किलो जावून पोहोचले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेत खाद्यतेलाची होत असलेली भाववाढ सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक बोजा टाकणारी ठरत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

तांदळाच्या भावातही वाढ

जिंतूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तांदळाला मागणी असते. जुन्या तांदळाची मागणी ग्रहाकांकडून वाढत असल्याने बाजारपेठेत तांदळाची झालेली भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. नवीन तांदूळ बाजारात आल्यानंतर भाव कमी होतील, अशी अपेक्षा असली तरी सद्यस्थितीत ४ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपयांवर प्रतिक्विंटल तांदळाचा भाव गेला आहे. त्यामुळे खाद्यतेलाबरोबरच तांदूळही महागल्याने संक्रांतीचा सण नागरिकांना महागाईच्या दिवसातच साजरा करावा लागणार आहे.

यावर्षीच्या वातावरणातील बदल तसेच इतर देशांमध्ये झालेले तेलबियांचे नुकसान त्यामुळे रिफाईंड तेलाची बाजारात टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे येत्या महिन्यात ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

गोपाळ चिद्रवार, होलसेल विक्रेते, जिंतूर