शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

भाषेच्या बाबतीत अगोदरच्या पिढ्या समृद्ध होत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:18 IST

परभणी : माझी आजी आणि मागील पिढीतील लोक बोलताना म्हणी, वाक्‌प्रचारांचा वापर करीत असत. त्यांच्याकडे भाषेचे संचित होते, ...

परभणी : माझी आजी आणि मागील पिढीतील लोक बोलताना म्हणी, वाक्‌प्रचारांचा वापर करीत असत. त्यांच्याकडे भाषेचे संचित होते, अनुभव होते, म्हणूनच भाषेच्या बाबतीत अगोदरच्या पिढ्या समृद्ध होत्या, असे प्रतिपादन लेखक प्रसाद कुमठेकर यांनी केले.

मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कवी प्रा. इंद्रजित भालेराव, डॉ. आसाराम लोमटे, प्रा. भारत काळे, मसापच्या अध्यक्षा सरोजताई देशपांडे, बाबा कोटंबे, प्रा. भगवान काळे आदींची उपस्थिती होती. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमात लेखिका वीणा गवाणकर यांची विशेष उपस्थिती होती. या ऑनलाइन कार्यक्रमात प्रसाद कुमठेकर यांनी ‘मला काय दिसतं, मला काय ऐकू येतं’ या विषयावर मनोगत व्यक्त केले.

कुमठेकर म्हणाले, भाषेच्या बाबतीत आजी समृद्ध होती. आम्ही कंगाल आहोत. आजीकडे संचित होते, अनुभव होते. आपण माहितीचे डस्टबिन झालोय. भाषेचे, संवादाचे महत्त्व कमी होत चालले आहे, असेही ते म्हणाले. मराठी भाषेत उत्पत्ती कोश, चरित्र कोश, वाङ्मय कोश असे विविध कोश निर्माण झाले आहेत. यामध्ये मराठी भाषेचा दुसरा क्रमांक लागतो; परंतु इंटरनेट आणि गुगल मॅपच्या जमान्यामध्ये संवाद कमी झाला आहे. भाषा कमी झाली. शब्द हरवत चाललेत. सर्व जण एकाच भाषेत बोलताहेत. परिसरातील बोलणं, बघणं, ऐकणं कमी होत चाललंय. त्यामुळं भाषा मरत चाललीय. कमी होत चाललीय, असे सांगून भाषा वाढवायची असेल, जगवायची असेल, तर श्रम व श्रमकऱ्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. तरच भाषा समृद्ध होईल, असे कुमठेकर म्हणाले. प्रा. सखाराम कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भगवान काळे यांनी आभार मानले.