शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

भाषेच्या बाबतीत अगोदरच्या पिढ्या समृद्ध होत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:18 IST

परभणी : माझी आजी आणि मागील पिढीतील लोक बोलताना म्हणी, वाक्‌प्रचारांचा वापर करीत असत. त्यांच्याकडे भाषेचे संचित होते, ...

परभणी : माझी आजी आणि मागील पिढीतील लोक बोलताना म्हणी, वाक्‌प्रचारांचा वापर करीत असत. त्यांच्याकडे भाषेचे संचित होते, अनुभव होते, म्हणूनच भाषेच्या बाबतीत अगोदरच्या पिढ्या समृद्ध होत्या, असे प्रतिपादन लेखक प्रसाद कुमठेकर यांनी केले.

मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कवी प्रा. इंद्रजित भालेराव, डॉ. आसाराम लोमटे, प्रा. भारत काळे, मसापच्या अध्यक्षा सरोजताई देशपांडे, बाबा कोटंबे, प्रा. भगवान काळे आदींची उपस्थिती होती. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमात लेखिका वीणा गवाणकर यांची विशेष उपस्थिती होती. या ऑनलाइन कार्यक्रमात प्रसाद कुमठेकर यांनी ‘मला काय दिसतं, मला काय ऐकू येतं’ या विषयावर मनोगत व्यक्त केले.

कुमठेकर म्हणाले, भाषेच्या बाबतीत आजी समृद्ध होती. आम्ही कंगाल आहोत. आजीकडे संचित होते, अनुभव होते. आपण माहितीचे डस्टबिन झालोय. भाषेचे, संवादाचे महत्त्व कमी होत चालले आहे, असेही ते म्हणाले. मराठी भाषेत उत्पत्ती कोश, चरित्र कोश, वाङ्मय कोश असे विविध कोश निर्माण झाले आहेत. यामध्ये मराठी भाषेचा दुसरा क्रमांक लागतो; परंतु इंटरनेट आणि गुगल मॅपच्या जमान्यामध्ये संवाद कमी झाला आहे. भाषा कमी झाली. शब्द हरवत चाललेत. सर्व जण एकाच भाषेत बोलताहेत. परिसरातील बोलणं, बघणं, ऐकणं कमी होत चाललंय. त्यामुळं भाषा मरत चाललीय. कमी होत चाललीय, असे सांगून भाषा वाढवायची असेल, जगवायची असेल, तर श्रम व श्रमकऱ्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. तरच भाषा समृद्ध होईल, असे कुमठेकर म्हणाले. प्रा. सखाराम कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भगवान काळे यांनी आभार मानले.