शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

जिंतुर ग्रामीण रुग्णालयात औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 18:34 IST

या रुग्णालयातील अधिकारी गरजूंना औषधी उपलब्ध करून देण्याऐवजी नाईलाज असल्याचे सांगत हतबलता दाखवत आहेत.

ठळक मुद्देएकिकडे अ‍ॅलोपॅथी औषधी उपलब्ध नसताना औषधी भांडारात मात्र लाखो रूपयांची आयुर्वेदिक, होमिओपॅथी तसेच युनानी औषधी पडून आहे़त

- विजय चोरडिया 

जिंतूर (परभणी ) : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध औषधींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून, या रुग्णालयातील अधिकारी गरजूंना औषधी उपलब्ध करून देण्याऐवजी नाईलाज असल्याचे सांगत हतबलता दाखवत आहेत.

जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात सध्यस्थितीत कफसिरप, आॅक्सीटोसीन, पाम इंजेक्शन, अ‍ॅव्हील, रॅनिटिडीन, आमॉस्प्रिलीन, मेट्रो, सिप्रो, रॅबीज लस आदी औषधी अनेक दिवसांपासून उपलब्ध नाहीत. या रुग्णालयात आलेल्या बहुतांश रुग्णांना पॅरासिटीमॉल किंवा अ‍ॅन्टीबायोटिकच्या दोन गोळ्या किंवा पोटदुखी, अ‍ॅसिडिटीच्या दोन गोळ्या देऊन बोळवण केली जाते. गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध करून दिल्या जात नाही. तसेच गेल्या सहा महिन्यांत येथे बोटावर मोजण्या इतकेच सलाईन रुग्णालयात आले आहेत. त्यामुळे अतिसंवेदनशील रुग्णालाच येथे सलाईन लावले जाते. इतर रुग्णांना मात्र खाजगी दुकानातून औषधी व सलाईन आणण्याचा सल्ला येथील डॉक्टर देत आहेत.

विशेष म्हणजे गरजू रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध न झाल्यास खाजगी दुकानातून ती खरेदी करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून मिळत असतो. वर्षभरात याअंतर्गत आलेल्या निधीतून औषधी खरेदी झाली की, नाही,  याबाबत शंका उपस्थित होत आहे. तसेच मानव विकास मिशन यंत्रणेमार्फत वेगवेगळी शिबिरे घेण्यासाठी, कुटूंबकल्याण कार्यक्रमासाठी लाखोचा निधी उपलब्ध करून दिला जातो़ या निधी खर्चाची चौकशी होणे गरजेचे आहे़ तसेच ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून एक्सरे मशीन आणण्यात आली आहे. मात्र एक्सरे फिल्म नसल्याने पंधरा ते वीस दिवसांपासून या रूमला कुलूप आहे. त्यामुळे रुग्णांना खाजगी सेवा घ्यावी लागते.

आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टर देतात अ‍ॅलियोपॅथीची औषधी

एकिकडे ग्रामीण रुग्णालयाची अशी अवस्था असताना ट्रॉमाकेअरमध्येही फारशी समाधानकारक स्थिती नाही. येथे अर्थोपिडीक तज्ज्ञ नाही. भूलतज्ज्ञ आहे; परंतु, ते नियमित रुग्णांची तपासणी करतात. बालरोग तज्ज्ञही अपघात विभागात सेवा देतात. त्यामुळे नेमके ट्रॉमाकेअर काढले तरी कशाला, असा प्रश्न निर्माण होत आहे. अपघातातील जखमी रुग्णांवर मलमपट्टी करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला पाठविले जाते. याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिंधीचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच प्रयोगशाळेतही शुगर कीट आदी तपासणीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध नाही.

रूग्णालयात अस्वच्छतेचा कळसग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेने कळस गाठला आहे़ बाथरुम व शौचालयात प्रचंड घाण असून रुग्ण वार्डामधील बेड अस्वच्छ आहेत. बेडवर फाटलेल्या गाद्या असून, त्यावर धूळ साचली आहे़ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, प्रसुती वार्डातही मोठी दुर्गंधी पसरत आहे़ या इमारत परिसरात डुकरांचा मुक्त संचार असल्याने रुग्णांना जीव मुठीत धरून दवाखाना करावा लागत आहे़ तसेच इमारतीच्या चोहीबाजूच्या खिडक्याची तावदाने तुटलेली आहेत़ तुटलेल्या तावदानाला पुठ्ठे व पत्रे बसविलेले आहेत़ शौचालयाची स्वच्छता केली नसल्याने प्रचंड दुर्गंधी येते़ परिसराला लागून असलेल्या शवविच्छेदन गृह परिसरातील निवाऱ्याचाही भलत्याचा कामासाठी वापर होत आहे़

अ‍ॅलोपॅथी, युनानी औषधी पडून एकिकडे अ‍ॅलोपॅथी औषधी उपलब्ध नसताना औषधी भांडारात मात्र लाखो रूपयांची आयुर्वेदिक, होमिओपॅथी तसेच युनानी औषधी पडून आहे़ विशेष म्हणजे, या औषधीची मुदत संपत चालली आहे़ या औषधींवर धूळ साचली आहे़ औषधी उपलब्ध असताना आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी डॉक्टर अ‍ॅलोपॅथीची औषधी देत आहेत़ त्यामुळे रूग्णांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicineऔषधंparabhaniपरभणी