शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

चालक-वाहकांची रात्र डासांसोबतच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:31 IST

परभणी : येथील एस. टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार आगारांच्या ५७ बसेस रात्री मुक्कामी थांबतात. मात्र, कोणत्याही ...

परभणी : येथील एस. टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार आगारांच्या ५७ बसेस रात्री मुक्कामी थांबतात. मात्र, कोणत्याही सुविधा या बसच्या चालक व वाहकांना मिळत नसल्याने दररोज २३२ कर्मचाऱ्यांना संपूर्ण रात्र एस. टी.मध्येच डासांसोबत घालवावी लागत आहे.

जिल्ह्यात पाथरी, गंगाखेड, जिंतूर व परभणी ही चार आगार आहेत. या चार आगारांतून दररोज ४००हून अधिक बसेस धावतात. यातील ५७ बसेस दररोज ग्रामीण व शहरी भागात मुक्कामी असतात. मात्र, या बससोबत असलेल्या २३२ कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नसल्याने रात्र डासांसोबतच घालवावी लागत आहे. त्याचबरोबर पाणी व जेवणाची कोणतीही व्यवस्था मुक्कामाच्या ठिकाणी केली जात नाही. उन्हाळ्यात गर्मी, पावसाळ्यात बस गळते तर हिवाळ्यात थंडीत वाहक व चालकांना कुडकुडत बसावे लागते.

शौचाला उघड्यावरच जावे लागते

चार आगारांतून ५७ गावांमध्ये मुक्कामी बस पाठवण्यात येतात. मात्र, या गावांमध्ये सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने चालक व वाहकांना सकाळी उठल्यावर शौचासाठी उघड्यावरच जावे लागते. त्यामुळे चालक व वाहकांमध्ये एस. टी. महामंडळाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मणक्याचे आजार वाढले

एस. टी. महामंडळाकडून ज्या नवीन बस सुरु करण्यात आल्या आहेत, त्या बसमध्ये आसन व्यवस्था आधुनिक असल्याने चालक व वाहकांना रात्री मुक्कामी थांबल्यानंतर एस. टी.मध्ये झोपताना अवघडल्यासारखे होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात चालक - वाहकांमध्ये मणक्याचे आजार वाढले आहेत.

कोरोनामुळे अडचणीत वाढ

ग्रामीण भागात मुक्कामी थांबल्यानंतर बसस्थानक परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये झोपण्यासाठी जागा मिळायची. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकवेळा हॉटेल चालक झोपण्यासाठी परवानगी देत नाहीत. कोरोनामुळे चालक व वाहकांच्या पिण्याच्या पाण्यासह झोपण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पावसाळ्यात कर्मचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार आगारांतील बहुतांश बस या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामीण भागात मुक्कामी थांबलेल्या बस गळतात. त्यामुळे वाहक व चालकांसमोर झोपावे कुठे, असा प्रश्न निर्माण होतो.

या संदर्भात मध्यवर्ती कार्यालयाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर त्रैमासिक सभेत हा प्रश्न उचलून धरत संबंधित सरपंचांनी चालक व वाहकांच्या राहण्याची व जेवणाची सोय करावी, यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला.

- गोविंद वैद्य

सचिव, एस. टी. कामगार संघटना