शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST

पावसाळा सुरू झाला की, या काळात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. सर्वाधिक आजार साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे पसरतात. त्यामुळे नागरिकांनी ...

पावसाळा सुरू झाला की, या काळात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. सर्वाधिक आजार साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे पसरतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे, तसेच पावसाळ्यात उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजारदेखील जडतात.

दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात.

याशिवाय पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

आजाराची लक्षणे

पोटात पेटके येऊन दुखणे व वारंवार जुलाब होणे.

उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे.

सतत तोंड कोरडे पडणे, वजनात घट होणे.

लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.

जुलाब वा उलट्यांमधून रक्त जाणे

पाणी उकळून प्यायलेले बरे

पाणी उकळून पिणे हा चांगला व सोपा उपाय आहे. दहा मिनिटे पाणी उकळून थंड झाल्यावर पिंपात भरून ठेवल्यास ते पाणी प्यायल्यावर पाण्यातील जंतूपासून होणारे कोणतेही आजार होणार नाहीत.

१० दिवसांतून एक वेळ परभणीकरांना पाणी

परभणीसाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली तरी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

शहराला सध्या १० दिवसांतून एक वेळा पाणी मिळत आहे. जुन्या पाईपलाईनमधूनही पाणीपुरवठा सुरू आहे. या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अधिक काळजीची गरज आहे.