शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST

पावसाळा सुरू झाला की, या काळात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. सर्वाधिक आजार साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे पसरतात. त्यामुळे नागरिकांनी ...

पावसाळा सुरू झाला की, या काळात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. सर्वाधिक आजार साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे पसरतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे, तसेच पावसाळ्यात उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजारदेखील जडतात.

दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात.

याशिवाय पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

आजाराची लक्षणे

पोटात पेटके येऊन दुखणे व वारंवार जुलाब होणे.

उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे.

सतत तोंड कोरडे पडणे, वजनात घट होणे.

लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.

जुलाब वा उलट्यांमधून रक्त जाणे

पाणी उकळून प्यायलेले बरे

पाणी उकळून पिणे हा चांगला व सोपा उपाय आहे. दहा मिनिटे पाणी उकळून थंड झाल्यावर पिंपात भरून ठेवल्यास ते पाणी प्यायल्यावर पाण्यातील जंतूपासून होणारे कोणतेही आजार होणार नाहीत.

१० दिवसांतून एक वेळ परभणीकरांना पाणी

परभणीसाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली तरी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

शहराला सध्या १० दिवसांतून एक वेळा पाणी मिळत आहे. जुन्या पाईपलाईनमधूनही पाणीपुरवठा सुरू आहे. या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अधिक काळजीची गरज आहे.