शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:23 IST

पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्हा दौऱ्यावर आले असता १६ सप्टेंबर रोजी जिंतूर व सेलू तालुक्यातील अडी अडचणींबाबत आढावा बैठक ...

पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्हा दौऱ्यावर आले असता १६ सप्टेंबर रोजी जिंतूर व सेलू तालुक्यातील अडी अडचणींबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना, जि. प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे, जि. प.चे उपाध्यक्ष अजय चौधरी, सभापती रामराव उबाळे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व बँक व्यवस्थापक उपस्थित होते. पालकमंत्री मलिक म्हणाले, सर्व बँकेच्या जिल्हा व्यवस्थापक तसेच अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे येत्या १५ दिवसांत मंजूर करावीत. शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे प्रत्येक पिकासाठीचे कर्ज देणे गरजेचे आहे. सेलू-जिंतूर तालुक्यातील येलदरी, चारठाणा, भोगाव, आडगाव, कौसडी, बामणी, वालूर, चिकलठाणा येथे नवीन राष्ट्रीयीकृत बँका सुरू करणे व १ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना पालकमंत्री मलिक यांनी दिल्या. यावेळी माजी आमदार विजय भांबळे, जि. प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी तालुक्यातील विविध समस्या व शेतकऱ्यांचे प्रश्न पालकमंत्री मलिक यांच्यासमोर मांडले.