शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

अंगणवाडीच्या निधी वितरणावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

परभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे अंगणवाडीच्या निधीवरून वाद निर्माण झाला असून, जि. प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी बांधकाम ...

परभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे अंगणवाडीच्या निधीवरून वाद निर्माण झाला असून, जि. प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी बांधकाम न करताच ५ लाख ९३ हजारांचा निधी गायब केल्याचा आरोप आ. मेघना बोर्डीकर यांनी केला आहे, तर उपाध्यक्ष चाैधरी यांनी हे आरोप फेटाळत सद्य:स्थितीत अंगणवाडीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगितले आहे.

जिल्हा नियोजन समितीने २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी जि. प.ला अंगणवाडी बांधकामासाठी निधी दिला होता. त्यानुसार बोरी येथे अंगणवाडीचे बांधकाम करण्यासाठी ५ लाख ९३ हजार १३३ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हे अंगणवाडीचे बांधकाम न करताच जि. प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी ग्रामपंचायतीमार्फत यासाठीचे पूर्ण बिल उचलून अपहार केल्याचा आरोप भाजपच्या आ. मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. सत्तेचा गैरवापर करीत हे काम करण्यापूर्वीच १२ फेब्रुवारी रोजी चौधरी यांनी कामाचे बिल उचलले. त्यानुसार या अंगणवाडीच्या कामाच्या नोंदी मोजमाप पुस्तिकेत घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेकडून कामाची ५ लक्ष ९३ हजार १५५ रुपयांची देयके आरटीजीएसद्वारे हस्तांतरितही करण्यात आली. याबाबत आपण जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संबंधित खाते होल्ड ठेवण्याचे असे लेखी आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच बोरी येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनाही निधीचा अपव्यय न होऊ देणेबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले असल्याचे आ. बोर्डीकर यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौधरी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

पराभवाच्या नैराश्येतून आरोप : चौधरी

जिल्हा परिषदेकडून अंगणवाडी बांधकामाचा निधी उचलून खर्च केलेला नाही. पूर्वी ज्या भागात अंगणवाडी मंजूर झाली, त्या भागात जागा मिळत नसल्याने इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून अंगणवाडीचे बांधकाम सध्या सुरू केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवातून नैराश्य आल्याने आ. मेघना बोर्डीकर यांनी हा आरोप केला आहे. सातत्याने अधिकाऱ्यांकडे बसून त्यांना त्रास देण्याऐवजी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून तोच वेळ त्यांनी जनतेच्या सेवेसाठी द्यावा, असे चौधरी म्हणाले.