शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या आकडेवारीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावरील पोर्टलमधील कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या आकडेवारीत फरक निर्माण झाला ...

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावरील पोर्टलमधील कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या आकडेवारीत फरक निर्माण झाला आहे. राज्याच्या पोर्टलवर रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेताना प्रशासनातच गफलत होत असल्याची बाब समोर आली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाने शहरी आणि ग्रामीण असे दोन विभाग केले असून, त्यानुसार त्या त्या भागातील कोरोनाबाधित मयत रुग्णांची नोंद घेतली जाते; मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने दररोज जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावर प्रकाशित होणाऱ्या पोर्टलवरील मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदीत तफावत येत आहे.

१८ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने एकूण १ हजार १५३ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेतली आहे. तर याच दिवशी राज्यस्तरावरून प्रकाशित झालेल्या प्रेसमध्ये जिल्ह्यात ८१२ आणि मनपा अंतर्गत ४५९ अशा १ हजार २७१ रुग्णांचा जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या ११८ रुग्णांची नोंद जिल्हास्तरावर घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे.

वाॅररुममधून केवळ नियंत्रण

कोरोनाबाधित रुग्णांच्या नोंदी घेण्यासाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका स्तरावर वाॅररुम तयार करण्यात आली आहे. या वॉररुममधून मृत्यूच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचप्रमाणे हीच आकडेवारी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम वाॅररुममधून होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमधून ही माहिती घेतली जाते. कधी माहिती मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे आकडेवारीत फरक येत आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यात मयत रुग्णांची आकडेवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत जाहीर केली जाते. त्यानंतर होणाऱ्या मृत्यूची नोंद दुसऱ्या दिवशी घेतली जाते. त्यामुळे दोन्ही बाबींचा फरक येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरी भागात सर्वाधिक मृत्यू

शहरी भागात महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मनपा हद्दीत ४५९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद राज्यस्तरावरील पोर्टलवर घेण्यात आली आहे.