शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या आकडेवारीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावरील पोर्टलमधील कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या आकडेवारीत फरक निर्माण झाला ...

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावरील पोर्टलमधील कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या आकडेवारीत फरक निर्माण झाला आहे. राज्याच्या पोर्टलवर रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेताना प्रशासनातच गफलत होत असल्याची बाब समोर आली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाने शहरी आणि ग्रामीण असे दोन विभाग केले असून, त्यानुसार त्या त्या भागातील कोरोनाबाधित मयत रुग्णांची नोंद घेतली जाते; मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने दररोज जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावर प्रकाशित होणाऱ्या पोर्टलवरील मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदीत तफावत येत आहे.

१८ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने एकूण १ हजार १५३ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेतली आहे. तर याच दिवशी राज्यस्तरावरून प्रकाशित झालेल्या प्रेसमध्ये जिल्ह्यात ८१२ आणि मनपा अंतर्गत ४५९ अशा १ हजार २७१ रुग्णांचा जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या ११८ रुग्णांची नोंद जिल्हास्तरावर घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे.

वाॅररुममधून केवळ नियंत्रण

कोरोनाबाधित रुग्णांच्या नोंदी घेण्यासाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका स्तरावर वाॅररुम तयार करण्यात आली आहे. या वॉररुममधून मृत्यूच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचप्रमाणे हीच आकडेवारी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम वाॅररुममधून होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमधून ही माहिती घेतली जाते. कधी माहिती मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे आकडेवारीत फरक येत आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यात मयत रुग्णांची आकडेवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत जाहीर केली जाते. त्यानंतर होणाऱ्या मृत्यूची नोंद दुसऱ्या दिवशी घेतली जाते. त्यामुळे दोन्ही बाबींचा फरक येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरी भागात सर्वाधिक मृत्यू

शहरी भागात महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मनपा हद्दीत ४५९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद राज्यस्तरावरील पोर्टलवर घेण्यात आली आहे.