शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

उपकेंद्रात लसीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST

मास्कचा वापर करण्याचे आवाहन खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घराबाहेर पडताना ...

मास्कचा वापर करण्याचे आवाहन

खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, त्याचबरोबर सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी यू. बी. बिराजदार यांनी केले आहे.

मिनी लॉकडाऊनचा फज्जा

गंगाखेड : जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिल रोजी मिनी लॉकडाऊन करण्याबाबत आदेश काढले होते. मात्र, या आदेशात स्पष्टता नसल्याने व्यापारी व व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने उघडली होती. मात्र, या मिनी लॉकडॉऊनमध्ये बेकरी, मिठाई, किराणा, औषधे दुकाने, रुग्णालय, कृषी सेवा केंद्र यांना उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. इतर दुकानांना बंद ठेवण्याचे आदेश होते.

उजव्या कालव्याची दुरवस्था

परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दोन वर्षांमध्येच दुरवस्था झाली आहे. जिंतूर तालुक्यातील कुंभारी, मारवाडी, पिंपळगाव, कौसडी आदी गाव परिसरातील या प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या फरशा जागोजागी उखडल्या आहेत. त्यामुळे या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग होण्याऐवजी नुकसानच जास्त होत आहे. याकडे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

विनापरवाना दारू वाहतूक वाढली

परभणी : तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री करण्याच्या उद्देशाने होणारी विनापरवाना दारू वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अवैध दारू विक्री करणार्‍यांना मोकळे रान सुटले आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा

सोनपेठ : अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे ज्वारी व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुका महसूल प्रशासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण

पूर्णा : तालुक्यातील पिंपळगाव परिसरात मागील काही दिवसांपासून रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाला रानडुकरांच्या उपक्रमांची माहिती दिली. मात्र, वन विभागाच्या उदासीन कारभारामुळे शेतकऱ्यांची गैरसोय अद्याप दूर झालेली नाही. विशेष म्हणजे हे रान डुक्कर कळप करून ठिकठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.