शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सत्ता स्थापनेच्या विलंबाचा विकास कामांवर परिणाम; प्रशासकीय यंत्रणा झाली संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 19:10 IST

सरकारी कार्यालयांमधून विकासकामांना फारसी गती मिळालेली नाही.

परभणी : विधानसभा निवडणुका पार पडून १५ दिवसांचा कालावधी उलटला तरीही सरकारी कार्यालयांमधून विकासकामांना फारसी गती मिळालेली नाही. राज्यात नवीन सरकार अद्यापही स्थापन झाले नसल्याने त्याचा परिणाम येथील प्रशासकीय कामकाजावर दिसून येत असून हे काम धिम्म्या गतीने सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यातील विकासकामांना ब्रेक लागला आहे. २१ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली. त्यानंतर निधी वितरण, विकासकामांची उद्घाटने, स्थानिक प्रश्नांची सोडवणूक या संदर्भातील प्रशासकीय कामकाज पूर्णत: थांबले. सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या धामधुमीत गुंतली गेली. 

सर्वसामान्य नागरिकांच्या कामांना आचारसंहितेचे कारण दाखवत पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे आचारसंहिता शिथील झाल्यानंतर या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. २७ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथील झाली. त्यानंतर विकासकामांना गती मिळेल, असे वाटत होते. मात्र अद्यापही प्रशासकीय कामकाजाला ठोस दिशा मिळालेली नाही. जुनी कामे कशी-बशी पूर्ण करण्यावर अधिकाऱ्यांनी भर दिला आहे. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये संथ गतीने कामकाज सुरु आहे. नागरिकही अद्यापपर्यंत कामे घेऊन शासकीय कार्यालयांकडे फिरकले नाहीत. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत असलेला शुकशुकाट आजही पहावयास मिळत आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने निधी वितरणासह इतर निर्णय घेणे शक्य आहे; परंतु, त्यासाठीही फारसा कोणी पुढाकार घेत नाही. त्यामुळे जुनीच कामे रेटली जात आहेत. 

जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीला कालव्यांची रखडलेली कामे, जलसंधारण, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्त्यांची कामे अशा अनेक कामांना गती मिळणे आवश्यक होते; परंतु, नवीन सरकार स्थापन झाले नसल्याने लोकप्रतिनिधींसह सर्वांचेच या कामांकडे दुर्लक्ष होत आहे.  त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेलाही राज्य सरकार स्थापन होण्याची प्रतीक्षा लागली असून त्यानंतरच प्रत्यक्ष विकासकामांना गती मिळेल.

नियोजन विभागाची कामेही संथ गतीने सुरुजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांना विकासकामांसाठी निधीचे वितरण केले जाते. यावर्षी विधानसभा निवडणुकापूर्वी नियोजन समितीने काही प्रमाणात निधी वितरित केला आहे. त्यानंतर आचारसंहिता शिथील होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र अजूनही शासकीय यंत्रणांचे प्रस्ताव दाखल होत नसल्याने निधी वितरणही रखडले आहे. नियोजन समितीने विकासकामांना आराखडा तयार केला असून या आराखड्यानुसार शासकीय यंत्रणांनी या समितीकडे प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे. यंत्रणांकडून प्रस्ताव येणार नसल्याने नियोजन समितीच्या निधीलाही ब्रेक लागला आहे. 

...तर निश्चित होईल धोरणनिवडणुका आटोपल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरु आहे. १४ दिवसांचा कालावधी उलटूनही नवीन सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या धोरणाने कामकाजाची दिशा ठरावयची, याबाबत संभ्रम आहे. जुनी कामे तर केली जात असली तरी नवीन निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे नवीन कुठलीही कामे जिल्ह्यात सुरु नाहीत. राज्य सरकार स्थापन झाल्यानंतरच प्रत्यक्ष प्रशासकीय  यंत्रणेलाही गती मिळणार आहे.

नुकसानीच्या पंचनाम्यावर भरआॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा मोठा असून जिल्हाभरात शेती पिकांचे पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सरसावली आहे. महसूल आणि कृषी विभागातील अधिकारी बांधावर जावून पंचनामे करीत आहेत. या कामांना मात्र गती मिळाल्याचे दिसत असले तरी उर्वरित विकासकामे ठप्प आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी