शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पाणीपुरवठा योजनेतील दिरंगाई ‘भूमिगत’साठी अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:15 IST

यासंदर्भात प्रहार संघटनेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्र शासनाने वाढत्या शहरीकरणामुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी भूमिगत ...

यासंदर्भात प्रहार संघटनेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्र शासनाने वाढत्या शहरीकरणामुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी भूमिगत गटार योजनेसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित महानगरपालिकेने शहरातील प्रतिव्यक्तीस प्रचलित लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा योजनेतून प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. जोपर्यंत प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा शहरात करण्यात येणार नाही. तोपर्यंत ही योजना मंजूर करण्यात येणार नाही, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. परभणी शहरात सध्या ८ ते १० दिवसांतून एक वेळा, तर महिनाभरात ३ ते ४ वेळा पाणी देण्यात येते. त्यामुळे शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी, भूमिगत पाणीपुरवठा योजनेसाठी शहर महानगरपालिका पात्र ठरत नाही. शहरातील पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन ती कार्यक्षमतेने सुरू झाल्याशिवाय ही योजना शहराला मिळणार नाही; परंतु शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे भूमिगत गटार योजना शहरात राबविणे शक्य नाही. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी व शहराच्या विकासातील अडथळा दूर करावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोंधने, गजानन चोपडे, पिंटू कदम, नारायण ढगे, ज्ञानेश्वर कदम, ज्ञानेश्वर पंढरकर, वैभव देसाई आदींनी केली आहे.