शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

बाजारपेठ भागात नागरिकांची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:47 IST

कार्यालयात वाढली अस्वच्छता परभणी : शहरातील शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता निर्माण झाली आहे. कार्यालयाच्या आतील भाग स्वच्छ ठेवला जात असला ...

कार्यालयात वाढली अस्वच्छता

परभणी : शहरातील शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता निर्माण झाली आहे. कार्यालयाच्या आतील भाग स्वच्छ ठेवला जात असला तरी कार्यालय परिसर मात्र अस्वच्छ असतो. या भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने धूळ वाढली आहे. त्याचा त्रास कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई

परभणी : यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच भूजलपातळीही वाढलेली आहे. असे असताना ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. कुठे पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित असल्याने तर कुठे योजना नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याकडे जि.प. पाणीपुरवठा विभागाने लक्ष द्यावे, ग्रामस्थांची मागणी आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम

परभणी : मार्च महिना जवळ आला असून, महावितरण कंपनीने आता थेट वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ग्रामीण भागामध्ये थकबाकीदारांची संख्या अधिक असल्याने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याने गावे अंधारात राहत आहेत.

गहू, हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ

परभणी : यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू आणि हरभऱ्याचा पेरा घेण्यात आला आहे. अनेक वर्षानंतर जिल्ह्याला कालव्याच्या माध्यमातून रब्बी हंगामात पाण्याचे तीन आवर्तन मिळाले. वेळेवर उपलब्ध झालेले पाणी आणि सिंचनासाठीच्या स्थानिक सुविधा निर्माण केल्याने यंदा गहू आणि हरभऱ्याच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत असून, दोन्ही पिकांचे उत्पादन साधारणत: महिनाभरात हाती लागणार आहे.

अंतर्गत रस्त्यांवर वाढले खड्डे

परभणी : शहरातील अनेक वसाहतींमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्तेही उखडले असून, वाहने चालविताना नागरिकांना कसरत करावी लागते. मागील अनेक महिन्यांपासून या समस्या सतावत आहेत. रस्त्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ही कामे ठप्प आहेत.