शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ भागात नागरिकांची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:47 IST

कार्यालयात वाढली अस्वच्छता परभणी : शहरातील शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता निर्माण झाली आहे. कार्यालयाच्या आतील भाग स्वच्छ ठेवला जात असला ...

कार्यालयात वाढली अस्वच्छता

परभणी : शहरातील शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता निर्माण झाली आहे. कार्यालयाच्या आतील भाग स्वच्छ ठेवला जात असला तरी कार्यालय परिसर मात्र अस्वच्छ असतो. या भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने धूळ वाढली आहे. त्याचा त्रास कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई

परभणी : यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच भूजलपातळीही वाढलेली आहे. असे असताना ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. कुठे पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित असल्याने तर कुठे योजना नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याकडे जि.प. पाणीपुरवठा विभागाने लक्ष द्यावे, ग्रामस्थांची मागणी आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम

परभणी : मार्च महिना जवळ आला असून, महावितरण कंपनीने आता थेट वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ग्रामीण भागामध्ये थकबाकीदारांची संख्या अधिक असल्याने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याने गावे अंधारात राहत आहेत.

गहू, हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ

परभणी : यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू आणि हरभऱ्याचा पेरा घेण्यात आला आहे. अनेक वर्षानंतर जिल्ह्याला कालव्याच्या माध्यमातून रब्बी हंगामात पाण्याचे तीन आवर्तन मिळाले. वेळेवर उपलब्ध झालेले पाणी आणि सिंचनासाठीच्या स्थानिक सुविधा निर्माण केल्याने यंदा गहू आणि हरभऱ्याच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत असून, दोन्ही पिकांचे उत्पादन साधारणत: महिनाभरात हाती लागणार आहे.

अंतर्गत रस्त्यांवर वाढले खड्डे

परभणी : शहरातील अनेक वसाहतींमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्तेही उखडले असून, वाहने चालविताना नागरिकांना कसरत करावी लागते. मागील अनेक महिन्यांपासून या समस्या सतावत आहेत. रस्त्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ही कामे ठप्प आहेत.