शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

'जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा,' जिल्हाधिकारी कार्यालयात टाकली सोयाबीनची करपलेली झाडे

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 4, 2022 19:58 IST

जिल्ह्यात सलग बावीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.

परभणी : जिल्ह्यात सलग बावीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तत्काळ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोयाबीनची करपलेली झाडे टाकून प्रशासनाचा निषेध नोंदविला.

परभणी जिल्ह्यात जवळपास पाच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची पेरणी केली. ही पिके बहरात असताना ऑगस्ट महिन्यापासून सलग बावीस दिवस पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या शेंगा भरत असतानाच ही उघडीप शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली. पावसाने उघडीप दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करणे गरजेचे होते. मात्र, जिल्हा प्रशासनाला याबाबत कोणतेच देणे- घेणे नसल्याचे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोयाबीनची करपलेली झाडे टाकून प्रशासनाचा निषेध नोंदविला.

त्यानंतर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले. यावेळी शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, माधवी घोडके, रामेश्वर जाधव, सय्यद मुस्तफा, ज्ञानेश्वर पंढरकर, नकुल होगे, उद्धव गरुड, माऊली गरुड, सचिन शेरे आदींची उपस्थिती होती.