शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

६८ दिवसांनंतर थांबले बाधितांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

परभणी : कोरोना संसर्ग काळात २० एप्रिलपासून सुरू झालेले बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र अखेर ८ जून रोजी थांबले. दिवसभरात ...

परभणी : कोरोना संसर्ग काळात २० एप्रिलपासून सुरू झालेले बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र अखेर ८ जून रोजी थांबले. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने, तब्बल ६८ दिवसांपासून सुरू असलेले मृत्यू अखेर मंगळवारी थांबले आहेत.

कोरोना लाटेच्या दुसऱ्या टप्प्यात बाधित रुग्णांच्या वाढलेल्या संख्येबरोबरच दररोज रुग्णांचे मृत्यू होत असल्याने चिंता वाढल्या होत्या. १९ मार्च रोजी जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. नवीन रुग्ण संख्याही २००च्या आसपास होती. मात्र, २० मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले. सुरुवातीला ३ ते ४ रुग्णांचे दररोज मृत्यू होत होते. ही संख्या पुढे २२ रुग्णांपर्यंत पोहोचली. मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत असल्याने, जिल्हावासीय चांगलेच धास्तावले होते. मागच्या तीन-चार आठवड्यांपासून कोरोनाचा हा संसर्ग कमी झाला असला, तरी दररोज रुग्णांचा मृत्यू होत असल्याने चिंता कायम होत्या. ८ जून रोजी मात्र एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने घेतली नाही. मृत्यूची संख्या शून्यावर आल्याने खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी आरोग्य विभागाला १ हजार ७४७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ४६ अहवालांमध्ये १७ आणि रॅपिड टेस्टच्या ७०१ अहवालांमध्ये ८ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात एकूण २५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५० हजार २८४ झाली असून, ४८ हजार ३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४९ एवढी आहे. सध्या ९९६ रुग्ण उपचार घेत आहेत.

१९१ रुग्ण कोरोनामुक्त

मंगळवारी दिवसभरात १९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. कोरोनामुक्तीचा वाढलेला दर, बाधित रुग्णांची आणि मृत्यूची घटलेली संख्या याबाबत जिल्ह्यासाठी समाधान देणाऱ्या ठरत आहेत.