मो.या.शेख, वस्साआकाशात होणारी काळ्या ढगांची गर्दी, जोरदार पाऊस पडणार असे वाटत असतानाच सुटणारा जोराचा वारा, ज्यामुळे पळणारी काळी ढगं, लख्ख पडणारं उन्ह आणि पुन्हा पावसाचा चकवा, अस दररोज वातावरण ज्यामुळे दिवसागणिक दुष्काळाचे गडद सावट निर्माण होत आहे.अर्धा जुलै महिना संपत आला तरी पावसाचा चकवाच. पावसाच्या चकव्याने जिंतूर तालुक्यातील वस्सा परिसरातील बळीराजा हवालदिल झाला आहे. कोरडीठाक जाणारी नक्षत्र आणि लांबणारी पेरणी यामुळे परिसरावर गडद होत जाणारे दुष्काळाचे सावट यामुळे परिसरातील आर्थिक व्यवहार पूर्णत: मंदावल्याचे चित्र सध्या परिसरात बघावयास मिळत आहे. हतबल झालेल्या बळीराजाचे डोळे आशाळभूत नजरेने पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. धाडस करुन ज्यांनी पावसाच्या काही सरीवर पेरणी केली ते दुबार पेरणीच्या धास्तीने अस्वस्थ झाले आहेत. लांबलेल्या पावसाचा परिणाम परिसरातील आठवडी बाजारावर होत असल्याचे बघावयास मिळत आहे. शनिवारी आडगाव बाजार येथील आठवडी बाजार लोकांविना अर्धवटच राहिला. ग्राहक नसल्याने छोटे-मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. हॉटेल्सचा व्यवसाय निम्म्याने घटल्याचे अनेकांनी सांगितले. पावसाने कमालीची ओढ दिल्याने परिसरातील लोकांनी जे-जा ही घटली आहे. पावसाने दडी मारल्याने गावाची रयाचं काळवंडली असून भेसूर चित्र दिसू लागले आहे. पावसाने दमदार हजेरी लावावी यासाठी सारेच आपापल्या परीने देवाकडे साकडे करु लागले आहेत.
दुष्काळाचे गडद सावट
By admin | Updated: July 16, 2014 00:18 IST