शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

तीन लाख हेक्‍टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST

परभणी : जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यातच खरीप हंगामातील पेरण्या झाल्या असून, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या ...

परभणी : जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यातच खरीप हंगामातील पेरण्या झाल्या असून, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने उगवलेली पिके कोमेजून जात आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मागील दोन वर्षांपासून खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस होत आहे; परंतु या हंगामाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी पावसाळ्यात सरासरीएवढा पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्याचप्रमाणे जून महिन्यात सर्वाधिक पाऊस असल्याचीही शक्यता या विभागाने वर्तविली. त्यामुळे शेतकरी उत्साहाने पेरणीच्या तयारीला लागले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यातच सुरुवातीला चांगला पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिके घेतली आहेत.

पेरणी झालेली पिके आता उगवली असून, कोवळ्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. याचवेळी पावसाने दगा दिला असून, १५ ते २० दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. पिके ऊन धरू लागली असून मुळाजवळील ओलावा कमी होत असल्याने कोमेजून जात आहेत. अशा वेळी कोळपणी करून या पिकांना जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. तसेच या हंगामातील पिके हाताशी येत असतानाच अतिवृष्टीने पिकांची मोठी नासाडी केली होती. या संकटातून सावरत यावर्षी शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणी केली. मात्र, आता पाऊस गायब झाल्याने पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांना सतावत आहे. येत्या एक-दोन दिवसांत पाऊस झाला नाही तर पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ येते की काय? अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजामुळे फसगत

यावर्षी पाऊसमान चांगले राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. या अंदाजावर भरोसा ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; परंतु पिके वाढीच्या कालावधीतच पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

हेक्‍टरी १५ हजार रुपयांचा भुर्दंड

जिल्ह्यात सद्य:स्थितीला सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला आहे. हे पीक पाण्याअभावी कोमेजून जात आहे. दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास शेतकऱ्यांना हेक्‍टरी किमान १५ हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शिवाय पिकाची उगवण क्षमता कमी होणार असल्याने उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातून एकूण पेरणी क्षेत्र

५ लाख २१ हजार १००

झालेली पेरणी १ लाख ८० हजार

सोयाबीन ८००००

कापूस ९७०००

तूर २०००

मूग ५००

उडीद २००

ज्वारी १०० क्षेत्र हेक्टरमध्ये