शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पीककर्जाचे उद्दिष्ट १२१३ कोटींचे; वाटप केवळ ५२१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST

जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचा फटका बँकांच्या ...

जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचा फटका बँकांच्या कर्ज वाटपाच्या प्रक्रियेलादेखील बसला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील या वर्षीची पिके बहरात असतांना ही कर्ज वाटपाची गती मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात २०२१-२२ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने १२१३ कोटी २२ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ११ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील खाजगी, व्यावसायिक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ८२ हजार ९२ शेतकऱ्यांना ५२१ कोटी ९९ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करत ४३ टक्के पीककर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला असून कोरोना काळात संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला बँकांनी तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्हा बँक पोहोचली १०८ टक्क्यांवर

परभणी जिल्ह्यातील व्यावसायिक बँकांना जिल्हा प्रशासनाने ७८१ कोटी ५८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी ११ ऑगस्टपर्यंत या बँकांनी २० हजार ५३५ शेतकऱ्यांना २०० कोटी ८२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत केवळ २५ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तर दुसरीकडे १०१ कोटी १८ लाख रुपयांचे खासगी बँकांना पीककर्जाचे उद्दिष्ट दिले असतानाही या बँकांनी केवळ १५७३ शेतकऱ्यांना १८ कोटी ७७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. या बँकांनी केवळ १८ टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १७ हजार २८९ शेतकऱ्यांना १४८ कोटी ५४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करत ७९ टक्के पीककर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँके शाखेला १४२ कोटी ८३ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना या बँकेने आतापर्यंत ४२ हजार ६९५ शेतकऱ्यांना १५३ कोटी ८६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करत १०७ टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.