शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

CoronaVirus : वा रे प्रशासन ! भर उन्हात माळरानावर केले ४२ जणांना क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:39 IST

42 ऊसतोड कामगार लहान मुलांसह भर उन्हात डोंगरावर राहण्यास मजबूर

ठळक मुद्देगावकऱ्यांनी गावात घेण्यास दिला नकार 

जिंतूर : तालुक्यातील वरुड नरसिंह येथे सांगलीहून आलेल्या ऊसतोड कामगारांना गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. यामुळे ४२ ऊसतोड कामगार दोन दिवसापासून कसलाही निवारा नसताना डोंगरावर राहण्यास मजबूर झाले आहेत.

तालुक्यातील वरुड नरसिह  येथील 42 ऊस तोड कामगार सांगली जिल्ह्यातील माढा येथे साखर कारखान्यात ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते.  23 एप्रिल रोजी हे सर्व कामगार ट्रॅक्टरद्वारे जिंतूरला आले, प्रशासनाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून वरून  नरसिह येथील शाळेमध्ये क्वारेंटाईन केले. परंतु गाववकर्‍यांनी व  ग्रामसेवक, पोलीस पाटील ,तंटामुक्ती अध्यक्ष ,सरपंच , तलाठी यांनी शाळेत क्वारंटाईन करण्यास विरोध केला. तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारेंटाईन करण्याऐवजी गावाच्या बाहेर दीड  किलोमीटर अंतरावरील डोंगरावर जाण्याचा सल्ला दिला. गावापासून दूर दीड किमी अंतरावर असणाऱ्या डोंगर-माळावर कसलीही सुविधा नसताना नाईलाजाने राहाव लागत आहे.

ना निवारा ना अन्न पाण्याची सोययेथे निवारा,पाणी,वीज,जेवण याची कसलीच व्यवस्था नाही. सावलीसाठी एका झाडाचा आसरा घेत ते दिवस काढतात तर रात्री अंधारात ओसाड माळरानावर झोपातात. तहान लागल्यास बाजुच्या शेतातील जनावरांसाठी साठवलेले शेवाळेयुक्त हौदातील पाणी प्यायचं असे विदारक चित्र आहे. यामुळे महिला, लहान मुले यांचे प्रचंड हाल होत आहेत. ही देखील माणसं आहेत, याची जाणीव ना प्रशासनाला ना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना, ग्रामसेवकांना आहे. 

समितीवर कारवाई कराया सर्व प्रकरणाला गावातील सरपंच व ग्रामसेवक ,पोलीस पाटील, तलाठी, तंटामुक्त अध्यक्ष, ही कमिटी जवाबदार आहे. ग्रामसेवक व तलाठी यांनी किमान शासनाने प्रतिनिधी म्हणून सर्व बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असताना असा घाणेरडा प्रकार झाला. या सर्वावर कठोर कारवाई करण्याची मागणी आपत्ती व्यवस्थापन सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता व्ह्हो्उ शकला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी