शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

मतदानावरून परतल्यानंतर कोरोनाच्या चाचणीला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:15 IST

परभणी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी थांबलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची परतल्यानंतर कोरोना चाचणी झाली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल ...

परभणी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी थांबलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची परतल्यानंतर कोरोना चाचणी झाली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल दिसून येत आहे.

जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ४९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हास्तरावरून अनेक कर्मचारी ग्रामीण भागात मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी पोहोचले. सकाळी ७.३० वाजेपासून ते ५.३० वाजेपर्यंत हे कर्मचारी अनेक नागरिकांच्या संपर्कात आले. त्यामुळे निवडणुकीहून परतल्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोनाचा चाचणी करणे बंधनकारक होते. मात्र जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारची चाचणी झाली नाही. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह उमेदवारांचीही कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना होत्या. मात्र त्याकडेही फारासे गांभीर्याने पाहण्यात आले नाही. आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी २५ टक्के उमेदवारांच्याच चाचण्या करण्यात आल्या. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तर निवडणुकीपूर्वीही चाचण्या झाल्या नाहीत. आणि निवडणूक पार पडल्यानंतरही या चाचण्या करण्यात आल्या नाहीत. काही लक्षणे आढळली तर स्वत:च चाचणी करून घेऊन असे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. परंतु, प्रशासनाने मात्र या चाचण्या न केल्याचे समोर आले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर परतलेल्या काही कर्मचाऱ्यांनी स्वत:हूनच आरोग्याची काळजी घेण्याचे ठरविले आहे. या कर्मचाऱ्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने काळजी करण्याचे कारण नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने त्याकडे काणाडोळा केला.