शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कोरोनाने नऊजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या नऊ रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला असून, ८२१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मागील ...

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या नऊ रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला असून, ८२१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब चिंतेची झाली आहे.

मागील तीन दिवसांच्या तुलनेत रविवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही घटली असून, मृत रुग्णांची संख्याही कमी झाल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. २ मे रोजी दिवसभरात जिल्हा रुग्णालयात २, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ६ अशा एकूण नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ५ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाला रविवारी २ हजार ४६९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार ७८९ अहवालांमध्ये ६०६ आणि रॅपिड टेस्टच्या ६८० अहवालांमध्ये २१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ हजार २५६ झाली असून, २९ हजार १३ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. ९१७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ८ हजार ३२६ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात २१७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४८, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २६५, अक्षदा मंगल कार्यालयात १५९, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये २०० रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्याचप्रमाणे ६ हजार ७९४ रुग्ण घरी राहून उपचार घेत आहेत.