शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

कोरोनाने जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला असला तरी सोमवारी उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाची धास्ती कायम ...

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला असला तरी सोमवारी उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाची धास्ती कायम आहे.

दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग घटल्याने जिल्हावासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. २१ डिसेंबर रोजी आरोग्य विभागाने दिवसभरात ३९७ नागरिकांच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआरच्या साह्याने तपासण्या केलेल्या ३१६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ४ पॉझिटिव्ह आढळले. तर ८१ नागरिकांची रॅपिड ॲंटीजेन टेस्टच्या साह्याने तपासणी झाली असून, त्यामध्ये दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मागील दोन आठवड्यापासून कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते. मात्र सोमवारी एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात शासकीय रुग्णालयात उपचार घेणारा एक पुरुष आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे. दोघांचा मृत्यू झाल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता एकूण ७ हजार ४८३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ हजार ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २९९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या १२० रुग्ण उपचार घेत आहेत.

१९ रुग्णांना सुटी

शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या १९ रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने या रुग्णांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे. बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.

या भागात आढळले रुग्ण

सेलू शहरातील शास्त्रीनगर येथील ३८ वर्षीय महिला, विद्यानगरातील ३२ वर्षीय पुरुष, परभणी शहरातील लोकमान्यनगर येथील ३९ वर्षीय पुरुष, सिंचननगरातील ३५ वर्षीय पुरुष, नवा मोंढा भागातील ४४ वर्षीय पुरुष आणि मानवत शहरातील मेनरोड भागातील ६१ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी कोरोनाबाधित आढळलेल्या ६ रुग्णांमध्ये ५ पुुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.